Saturday, April 21, 2018

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे -पुण- सुरेख निसर्ग -गौरव गीत " हिरवं हिरवं जंगल -

पुस्तक परिचय -
अरुण वि.देशपांडे -पुणे.
------------------------------------------

 सुरेख निसर्ग -गौरव गीत "
हिरवं हिरवं जंगल -
----------------------------------------
लेखिका -कवयित्री लीला शिंदे  -  बालसाहित्यात सातत्याने लेखन करणाऱ्या साहित्यकार म्हणून परिचित आहेत,
"हिरवं हिरवं जंगल " हा त्यांचा बालकुमार कवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. महत्वाच्या सामाजिक समस्येला अनुसरून त्याबद्दल लिहिणे "कवीचे एक महत्वाचे लक्षण असते ..कवयित्री लीला शिंदे यांच्या प्रस्तुत संग्रहातील कविता या  निसर्ग , सृष्टी , जंगल , या विषयवर आहेत , या सर्वांशी माणूस म्हणून आपला संबंध येतो  तो कसा आहे ? याचे उत्तर  देणारी त्यांची कविता एक महत्वाचा संदेश देणारी आहे.
संग्रहाच्या मलपृष्ठावर असलेल्या कविता ओळी - म्हणजे या कविता लेखनाचे प्रयोजन आहे ..कवयित्री म्हणते आहे की -
जंगलाचा ऱ्हास होतोय.
नासधूस होतीय .
त्याला राखणं , जपणं 
हे आपलं काम आहे .
तो भावी पिढीचा ठेवा आहे.
तो त्यांच्या मनात या 
कवितामधून 
रुजला जाईल
अशी आशा वाटते .

कवीचा आशावादी दृष्टीकोन हाच मोठा संस्कार करणारा आहे असे म्हणावेसे वाटते , त्यामुळे कवी जे सांगतोय ते या वाचकांच्या मना पर्यंत थेट पोचते .
जंगला बद्दल  कवितेतून सांगणे हे कवीला सहज जमले आहे ..
" चला चला रे जंगलात जाऊ 
गमती जमती डोळाभर पाहू 
खाली वरती चोहीकडे 
जंगलात सदा नाट्य घडे ...( जंगल सफारी .. पृ.१५ ),
अशा या जंगलाची सफर सुंदर आहे , रम्य आणि थरारक आहे , हे जंगल ज्या निसर्ग -सृष्टीचा भाग आहे , ती सुर्ष्टी कशी आहे ..बघा या कवितेत ...

" धरती वरती नद्या वाहती 
हिरवी शेते अवखळ वारा सोबती 
इंद्रधनूची वरात 
अवतरली धरती वरती ...(किती सुंदर सृष्टी ...पृ..१९ ),

अशा या हिरव्या जंगलात सृष्टीचे सुंदर रूप आपल्या नजरेस पडत असते .हिरवे डोंगर , नदी ,तलाव ,
 आणि तळे  या ठिकाणी  "एक सोहळा "पहावयास मिळतो ..त्याची एक सुंदर कविता आहे..
या तळयात .काळे-पांढरे सुंदर बगळे , सुळसुळ पळणाऱ्या मासोळ्या , पाणकोंबडे, पांढरेशुभ्र करकोचे " असे पाण-पक्षी आहेत ..एकाचवेळी हे सगळे पहाणे किती छान असेल ? त्या साठी जंगलात गेलेच पाहिजे.

निसर्ग आणि त्याचे सौंदर्य अचूक शब्दात व्यक्त करणारी कविता " ,  कवयित्री लीला शिंदे यांच्या लेखनाचा एक सुंदर अविष्कार या कवितांच्या निमित्ताने झाला आहे.
माणूस म्हणून तुम्ही आम्ही नेमके कसे आहोत ..निसर्ग संपत्ती आणि जंगल वैभव .याच्याशी आपले नाते आहे ते कसे स्वार्थी आणि विध्वंसक झाले  आहे यावर बोलणारी "हव्यास " ही कविता पहा..

"माणसाचा खोटा हव्यास 
जंगलाचा  केला नास 
पोटी आटले  चैतन्य 
झाला हिरवाईचा ऱ्हास... 
हे सगळे यावरच नाही थांबले ..त्याचा परिणाम ..कसा झाला त्यावर नेमके भाष्य .कवयित्री करते ..
" हिरवा झाड झाडोरा 
फळा फुलांनी लागडला
जंगलाचा तो तोरा 
किती ओसाड उजाडला ...(   "हव्यास ", पृ..५ ) 
असे वास्तव चित्रण या कवितेतून येते, आणि हे वाचून मन अस्वस्थ होऊन जाते ..

या शिवाय ..या संग्रहात ..जंगल ", नदीमाउली ", उत्तुंग उंच डोंगर हिरवे  ", " किमया ", डोंगरबाबा ", " पानगळ ", खारूताई "  अशा कविता आहेत  या सर्व कविता  " हिरवं हिरवं जंगल " संग्रहातून एका अर्थाने निसर्ग संस्कार करतात.
माणसाने निसर्ग -हनी केली आहे , जंगल नष्ट केले आहे " मग याची भरपाई तर माणसाने केलीच पाहिजे ..या भावनेतून कवयित्री म्हणते ..
एक नवं झाड लावू या 
परोपकराच बी रुजवू या ... ( पृ.२४ )
या संस्कार -विचारास आपण प्रत्यक्ष्य कृतीत  आणू शकलो तर  "जंगल " या भावी पिढ्यांच्या ठेव्याचे रक्षण केल्याचे समाधान आपण नक्कीच मिळवू शकतो " कवयित्रीच्या या आशावादी हेतूस यश मिळावे अशी प्राथना करू या.
"हिरवं हिरवं जंगल "  या कविता संग्रहाचे यथार्थ मुखपृष्ठ ,आतील रेखाचित्रे ..व सजावट, चित्रकार -प्रकाशक ल.म.कडू सर यांची आहे ", या उल्लेखाने सुद्धा हे पुस्तक प्रत्यक्षात किती सुरेख असेल याचा अंदाज येतो.

खूप छान कविता ,आणि तितकाच सुरेख कविता संग्रह ..हिरवं हिरवं जंगल " बद्दल कवयित्री लीला शिंदे , प्रकाशक - ल.म.कडू  आणि गमभन प्रकाशन यांचे अभिनंदन.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय 
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------------------
कवयित्री लीला शिंदे 
संपर्क -९४२१६८८५७६ 
हिरवं हिरवं जंगल 
कविता संग्रह 
पृ.- २४ , मुल्य रु.३० /-
ल.म.कडू 
गमभन प्रकाशन -पुणे.
०२०- २४४५८१४१ 
-----------------------------------------------------

1 comment: