#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख- भाग -५ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथा लेखक- १. अमित सोनवणे , २.शशांक गिरडकर , ३. रुपाली मोनीष खैरनार
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रसिक वाचक-मित्र हो -
कुबेर समूह प्रकाशित संवादिनी कथासंग्रह -आतापर्यंत आपण या लेख-मालिकेचे चार भाग वाचले आहेत . या कथासंग्रहातील
कथा-लेखन हे वाचनीय आहे : हे आता वेगळ्याने पुन्हा-पुन्हा सांगायचे प्रयोजन राहिलेले नाही.
कुबेरकर लेखक आणि लेखिका यांचे पुस्तक-रूपाने आलेले कथा लेखन वाचकांच्या अपेक्षा नक्कीच वाढवणारे आहे ".
आजच्या लेखात आपण खालील कथांचा आस्वाद घेऊ या .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१.कथा -
शिर्षक- एक धागा सुखाचा (पृ. ४८ ), ले- अमित सोनवणे -नंदुरबार
------------------------------------------------------------------------------------------------
माणसाचे आयुष्य हे एक जरतारी वस्त्र आहे ..यात दु:खाचे धागे शंभर काय , हजारो असतात ,आणि सुखाचा धागा
मात्र एकच असतो , "
या अर्थाची प्रचीती यावी अशी एक सुंदर कथा या संग्रहात आहे.."एक धागा सुखाचा .."
..अभ्यंग "या तरुणाच्या कलात्मक ध्यासाची आणि त्या ध्यासाच्या पूर्ततेसाठी त्याने केलेल्या परिश्रमपूर्वक अशा वाटचालीची
कथा लेखक- अमित सोनवणे यांनी अतिशय सुरेख पद्धतीने खुलवली आहे.
सुख पाहता जवापाडे | दु:खः पर्वताएवढे || हेच अभ्यंगच्या आयुष्याचे गमक आणि सत्य आहे ..या वाक्याने कथेचा आरंभ होतो.
अभ्यंगचे वडील एक निष्णात असे हातमाग- कारागीर , पैठणी विणून ऐश्वर्य कमावणारे आपले वडील त्यांच्या संसाराचा सारीपाटाचा
डाव अर्ध्यावर टाकून .त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेत ..नातेवाईक आणि इतर लोकांच्या त्रासामुळे अतिशय हलाखीचे
असे आयुष्य त्याच्या आईच्या वाट्याला आले ..आणि इथून अभ्यंगच्या आणि त्याच्या आईच्या संघर्षमय आयुष्य प्रवासास सुरुवात होते.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला ठेवीत पैठणीच्या व्यवसायात काम करण्याची सक्ती त्याची आई करते , तो देखील हे काम करू लागतो ,
त्याच वेळी सर्वांना जाणवते ..त्याच्या बोटा मध्ये धागा विणायची अजब जादू पांडुरंगाने त्याला दिली आहे.
अप्रतिम काम करायचा ध्यास " ही देणगी अभ्यंगला त्याच्या वडिलांच्या कडून वारश्याने मिळाली आहे.
.
अभ्यंग "ही फक्त एका माणसाची व्यक्तिरेखा नाहीये ..
ही कथा आहे- ती एका .स्वप्नाळू आणि तितक्याच हळव्या मनाच्या तरुणाची ,
जो एक निष्णात कारागीर आहे, आपल्या हातातील जादुई कलेचे मोल किती आहे "याची जाणीव त्याला आहे.
परिश्रम , कल्पकता ,जिद्द आणि आत्मविश्वास असला की एरव्ही सामन्य वाटणारा माणूस किती अफाट असे सुंदर कलात्मक कार्य करू शकतो "
हे अभ्यंग " या व्यक्तिरेखेतून लेखक अमित सोनवणे यांनी खूप छान रेखाटले आहे.
, त्याच्या जीवनात त्याची स्फूर्ती बनून आलेली वैष्णवी ,त्यांच्यातील प्रेम ..हे सगळ या कथेला वेगळ परिमाण देऊन जातात .
अभ्यंग ची स्वप्नपूर्तीची ही कथा वाचकांना सुखद अनुभव देणारी आहे.
लेखक- अमित सोनवणे यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा -
शिर्षक- गण्या . (पृ. ५४ ) ले- शशांक गिरडकर , वर्धा .
--------------------------------------------------------------------------------------------
लेखक - शशांक गिरडकर यांची "गण्या " ही कथा ..एक उत्तम अशी व्यक्ती -चित्रण "असलेली छान अशी कथा आहे.
दोन जिवलग मित्रांची ही कथा ..माणूस ,त्याचे आयुष्य , तो करीत असलेला आयुष्य-प्रवास "यावर आहे.
"गरीब-श्रीमंत " या भेदाचा परिणाम या दोन मित्रांच्या मैत्रीवर कधीच झालेला नाहीये,
क्रिकेट आणि सिनेमाची आवड " इतकेच साम्य असलेले हे दोन मित्र अगदी भिन्न स्तरावरचे आयुष्य जगणारे असले तरी
त्यांच्यातील मैत्री आणि मनातील मैत्र-भाव कायम आहे .
आयुष्य आणि आयुष्यात माणूस निर्णय घेत असतो . " काही निर्णय आयुष्यात आमुल्राग बदल करतात ", कथेतील हे वाक्य
फार महत्वाचे आहे , आणि गण्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारा हा निर्णय घेणारी ..गण्याची ..प्रेमिका ,जी पुढे
त्याच्या आयुष्याला सावरणारी , घडवणारी अशी त्याची बायको होऊन त्याची कायमची सोबती , सहचरी झालेली आहे.
लेखक तिच्या विषयी भावनिक मनोगत यक्त करतो ..पण या शब्दातून गण्याच्या मैत्रिणीचे " प्रेमिका आणि पत्नी " अशा
दोन्ही स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे सुरेख असे दर्शन आपल्याला लेखक घडवतो ,ते खूप छान आहे.
विमानात बसून प्रवास करणारा ..गण्या ..कायम जमींवर पाय असलेला गण्या , आणि , जरा ही न बदललेला तसाच "निरागस मित्र ..गण्या ,
गणेश आहे " ही भावनिक प्रचीती ..मनाला भारावून टाकणारी आहे.
आपण ही सहजपणे म्हणून जातो ..हे गणराया !
"गण्या " आहे तशी छोटीशी कथा ..पण मित्र -प्रेमाने अगदी काठोकाठ भरून गेलेली ही कथा मनस्पर्शी झाली आहे.
लेखक - शशांक गिरडकर यांना लेखन -शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा -
शिर्षक- मुक्त (पृ.६३ ), ले- रुपाली मोनीष खैरनार - मुंबई .
----------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी या कथासंग्रहात ..मोजक्याच अशा काही कथा आहेत ..ज्या चाकोरीबाहेरच्या विषयावर आहेत, अशा विषयावर लिहिणे
म्हणजे ..कथेच्या परिचित अशा परिघाच्या बाहेर जाऊन एखाद्या चर्चित विषयावर लेखन करणे असते .
लेखिका ..रुपाली मोनिष खैरनार ..यांनी त्यांच्या "मुक्त " या कथेतून ..समलिंगी मनोवृत्तीच्या "व्यक्तीचे चित्रण केलेलं आहे.
पायल आणि राशी "या दोन युवतींच्या मैत्री सहवासाची कथा ..यात मानसिक आंदोलने , मानसिक पातळीवर मनामध्ये सुरु झालेले
विरोधी आणि अकल्पनीय असे मनो-व्यापार सुरु झाल्याची चाहूल लागते .
राशीत होत जाणारे हे बदल जाणवतात आणि..त्यामुळे पायल तिला आधार द्यायला जाते, एका वेगळ्या भावनिक स्तरावर
या दोघी जगू लागतात , अशा क्षणी आपणच एकेमेकीसाठी कसे नि किती महत्वाचे आहोत हे दोघीना कळू लागते ..पटायला लागते.
स्वतःच्या नव्या विश्वात ..राशी जितकी खोल खोल गुंतत जाते, तितकीच आपल्या सोबत ती पायलला पण खेचून नेत असते ,जणू काही
राशीच्या सहवासात पायल संमोहित होऊन गेलेली आहे. अशा मनोवास्थेत राशी ..म्हणते ..पायल ..तुही माझ्या सारखीच आहेस ..
"homosexual..."समलिंगी !!!!!
पायल आणि राशी .या तसे पाहिले तर उमलू पहाणार्या कालिका आहेत, पण.. किती भयानक चक्रात त्या सापडल्या आहेत, या जाणीवेने
आपणपण अस्वथ होऊन जातो .
या चक्रातून राशी आणि पायल "या मुलींना बाहेर काढणाऱ्या पायलच्या आईची ..नामिताची सुद्धा ही कथा आहे...
या कथेतील आगळे-वेगळे भाव-विश्व , पायल आणि राशी, पायलची जागरूक - आई -नमिता , दोन्ही मुलींचे परिवार ,
समुपदेशक डॉक्टर निशा ..आपल्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहतील.
पूर्ण कथा वाचून पहा , खूप वेगळा अनुभव येईल .लेखन आणि शब्द योजना एकदम अचूक आहे, ज्यामुळे कथा तीव्र परिणाम साधून जाते.
आधुनिक जीवनशैलीच्या आहारी गेलेल्या समाज-समुहात ..या समस्येने आपले अस्तिव दाखवायला सुरु केले आहे.
अशा या समस्येवर लेखन करून
लेखिकेने "अतिशय महत्वाच्या अशा प्रश्नाकडे लक्ष वेधून धोक्याचा इशारा दिला आहे.
"मुक्ता " त्यांच्या लेखन-प्रवासातील एक लक्षणीय कथा ठरेल असे म्हणावेसे वाटते.
लेखिका रुपाली मोनीष खैरनार याना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रह परिचय लेख-
भाग -५ वा .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
-----------------------------------

