परीक्षण...पुस्तक -परिचय -
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
जीवन खरंच सुंदर आहे. (कविता संग्रह)
(कवी धनंजय शंकर पाटील.)
(कवी धनंजय शंकर पाटील.)
इंटरनेट आणि फेसबुकवर साहित्य लेखन करणाऱ्या लेखक -कवी मध्ये..सातत्याने विविध स्वरूपाचे लेखन करणारे -लेखक-कवी-चारोळीकार -धनंजय शंकर पाटील- मंगळवेढा , हे नाव वाचकांच्या चांगलेच परिचयाचे झाले आहे.
जानेवारी -२०१६ -म्हणजे या वर्षाच्या आरंभीच त्यंची एक नव्हे तर तीन पुस्तके प्रकाशित झालीत.
जानेवारी -२०१६ -म्हणजे या वर्षाच्या आरंभीच त्यंची एक नव्हे तर तीन पुस्तके प्रकाशित झालीत.
१." जीवन खरचं सुंदर आहे'- कविता संग्रह.
२.हृदयी वसंत फुलाला - चारोळी संग्रह
३.ती पुन्हा भेटली - कथा संग्रह
२.हृदयी वसंत फुलाला - चारोळी संग्रह
३.ती पुन्हा भेटली - कथा संग्रह
या पैकी - जीवन खरचं सुंदर आहे " या कविता संग्रहाचा परिचय करून देतो आहे.
इंटरनेट आणि फेसबुकवरील प्रकाशित साहित्याला वाचकांचा त्वरित प्रतिसाद लाभत असतो आणि यामुळे लेखक-कवींना लेखनास प्रोत्साहन मिळत असते..हे पाहूनच आपले साहित्य पुस्तक-रुपात प्रकाशित करावे असे साहित्यिकास वाटणे ' यात वावगे असे काहीच नाही.अशीच भावना कवी-लेखक धनंजय शंकर पाटील यांची आहे. जीवन खरचं सुंदर आहे "..त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह
.....,या संग्रहातील कवितेचे स्वागत करतांना एक गोष्ट सुचवावीशी वाटते ..ती म्हणजे ..हा संग्रह --
.....,या संग्रहातील कवितेचे स्वागत करतांना एक गोष्ट सुचवावीशी वाटते ..ती म्हणजे ..हा संग्रह --
"कवितेच्या शोधात निघालेल्या एक नवख्या कवीचा आहे ." .हे आपण वाचकांनी लक्षात घेऊन कवीच्या कवितांचे आस्वादन केले तर कवीच्या .पुढील लेखनास लेखन बळ देण्यासारखे प्रेरक कार्य होईल.
धनंजय पाटील हे लेखन करू शकतात हे त्यांच्या संग्रहातील कविता वाचून जाणवते. प्रस्तुत संग्रहातील कविता ..वाचून पहिली गोष्ट जाणवू लागते ती म्हणजे ..या कवीला जे दिसते ,, जे जाणवते त्यावर व्यक्त होण्याची त्याला एक प्रकारची असोशी आहे , अधीरता आहे.. यामागची त्यांची तळमळ आणि यामागची भावना निखळ आणि प्रामाणिक आहेत ,याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.
"जीवन खरचं सुंदर आहे " कविता संग्रहात एकूण ५७ कविता आहेत.
मनोगतात कवी म्हणतो आहे की- "शब्द जणू जीवनच झाले ,शब्दांशी घट्ट मैत्रीचे नाते जमले ..यातूनच अनेक विषयावर काव्य निर्मिती झाली ", हे अगदी खरे आहे.. कारण.. या संग्रहात - प्रेम विषयक अनेक कविता आहेत ,तसेच सामाजिक संदेश, माणसाच्या मनात असलेल्या विविध भावना ,आजच्या वर्तमानावर व्यक्त होणारी कविता ..अशा विविध कविता धनजंय पाटील यांनी लिहिल्या आहेत.
या संग्रहातील अनेक कवितांमधून कवी-धनंजय पाटील अतिशय भावनिक होऊन व्यक्त होतात ,त्यांच्या कवितेचे हे सुरेख लक्षण आणि वैशिट्य आहे.या संग्रहातील -
मला आवडलेल्या काही कवितांचा उल्लेख जरूर करू इच्छितो...
मला आवडलेल्या काही कवितांचा उल्लेख जरूर करू इच्छितो...
१.मनातल्या आठवणींचा हा लपंडाव सारा ,
वाहतात कधी-कधी अश्रूंच्या धारा .
चित्त नाही थाऱ्यावर ,
मनात फक्त आठवणींचेच घर . ...(मनातल्या आठवणी ..पृ.६ )
वाहतात कधी-कधी अश्रूंच्या धारा .
चित्त नाही थाऱ्यावर ,
मनात फक्त आठवणींचेच घर . ...(मनातल्या आठवणी ..पृ.६ )
२.शब्द ओठावरी येतात ,
मनातली भावना ,
सांगुनि जातात .
सुख , दु:ख्हांचे चक्र सारे
जीवनात वाहतात कधी-कधी ,
तुफानी वारे ........(मनातले काही .पृ.१४ )
मनातली भावना ,
सांगुनि जातात .
सुख , दु:ख्हांचे चक्र सारे
जीवनात वाहतात कधी-कधी ,
तुफानी वारे ........(मनातले काही .पृ.१४ )
३. आज आहे पैसा , घरदार ,
पर आई तुझ्या नसण्याने ,
मनाला वाटतो अंध:कार .....(आठवण मायेची ..पृ.२६ )
४. एकटे हे मन कधी रमून गेले ,
या कवितांच्या दुनियेत .
ते कधी कळलेच नाही ,
आता ध्यानी, मनी कविता आणि कविता .(पृ.२९ )
पर आई तुझ्या नसण्याने ,
मनाला वाटतो अंध:कार .....(आठवण मायेची ..पृ.२६ )
४. एकटे हे मन कधी रमून गेले ,
या कवितांच्या दुनियेत .
ते कधी कळलेच नाही ,
आता ध्यानी, मनी कविता आणि कविता .(पृ.२९ )
५. वाढल्या वाड्या अन वस्ती ,
वाटते मज घरटे बांधण्याची धास्ती
वृक्षतोड अमाप ही वाढली
जणू जगण्याची व्यवस्थाच मोडली ...(संघर्ष जगण्याचा ..(चिऊताई ) .( .पृ.५६ )
वाटते मज घरटे बांधण्याची धास्ती
वृक्षतोड अमाप ही वाढली
जणू जगण्याची व्यवस्थाच मोडली ...(संघर्ष जगण्याचा ..(चिऊताई ) .( .पृ.५६ )
६. कर सामना ,संघर्षमय जीवनाचा ,
तोल ढळू देऊ नको मनाचा .
खडतर प्रवासात या अपयशी मार्गाच्या ,
सूर गवसेल तुला जीवनाचा ...(जीवन संघर्ष ..(पृ.६४ ),
तोल ढळू देऊ नको मनाचा .
खडतर प्रवासात या अपयशी मार्गाच्या ,
सूर गवसेल तुला जीवनाचा ...(जीवन संघर्ष ..(पृ.६४ ),
कवी धनंजय पाटील यांच्या कविता लेखनाची झलक ..त्यांची आशावादी कविता --या पुढील लेखन प्रवासात अधिक जोमाने आपली वाटचाल करणारी असेल ..हे नक्की. धनंजय शंकर पाटील हे नुसते कवीच नाहीत तर ते कथाकार देखील आहेत ..साहित्यिक म्हणून त्यांची कामगिरी अधिकाधिक बहरत जावो अशा लेखन-शुभेच्छा त्यांना देतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
-----------------------------------------
कविता -संग्रह -
जीवन खरचं सुंदर आहे
पृ.६४ , मूल्य-रु.६० /-
कवी - धनंजय शंकर पाटील
मंगळवेढा, जि-.सोलापूर
संपर्क -८३८०९१६१५५
----------------------------------------------------
प्रकाशक -
विजय बुक सर्व्हिसेस -
सुशीलनगर , विजापूर रोड -
सोलापूर .
संपर्क- ९०२१७२७३३२
------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय -
-अरुण.वि.देशपांडे -पुणे
संपर्क -९८५०१७७३४२
-----------------------------------------
कविता -संग्रह -
जीवन खरचं सुंदर आहे
पृ.६४ , मूल्य-रु.६० /-
कवी - धनंजय शंकर पाटील
मंगळवेढा, जि-.सोलापूर
संपर्क -८३८०९१६१५५
----------------------------------------------------
प्रकाशक -
विजय बुक सर्व्हिसेस -
सुशीलनगर , विजापूर रोड -
सोलापूर .
संपर्क- ९०२१७२७३३२
------------------------------------------------------------------------