Friday, April 24, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . ले- अरुण वि.देशपांडे .
कथा लेखक -१.साधना मोरे - आरोटे २.संध्या हिंगे . ३. राहुल घायमुक्ते 
-------------------------------------------------------------------------------------------------------- 
वाचकमित्र हो - नमस्कार -

या लेखमालेतून आपल्याशी हा लेखन संवाद साधतांना ,मला खूप काही साधता आल्याचा आनंद मिळतोय .
 संवादिनी कथा संग्रहातील ..कथा वाचून मग त्यावर लिहायचे ..त्यासाठी या कथा मन लावून  वाचत जातोय ,
तस तसे कथा लेखन , कथा-आशय , विषयानुरूप कथा लेखन, कथा रंगतदार कशी होते ? ,
कथा  आकर्षक   पद्धतीने कशी लिहायची ?
 कथेचा शेवट ..कोणता असावा ? जो  वाचकांच्या मनावर परिणाम करणारा असेल.,
मला माझ्या या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ..संवादिनी "कथा संग्रहातील ..संवादी" कथांच्या वाचनातून मिळते आहे.'

कथालेखन करणार्यांना "संवादिनी "कथा संग्रहाची    शिफारस     कथा -लेखनासाठी .एक स्टडी -प्रोजेक्ट  म्हणून करीन ,
या निमित्ताने  वाचकांच्या वतीने पुन्हा एकदा ..
कुबेर प्रकाशन , प्रकाशक - श्री.संतोष जगन्नाथ लहामगे, आणि संवादिनी "कथा संग्रहातील सहभागी कुबेरकर 
साहित्यिकांचे अभिनंदन करतो.

आजच्या लेखात  खालील तीन कथांचा आस्वादक परिचय करून देतो आहे.

१. कथा - पोरखेळ ", (पृ. ९४ ) ले- साधना मोरे -आरोटे - मुंबई 
-------------------------------------------------------------------------------------------------------
पोरखेळ " ही कथा .एका दुर्दैवी "ती "ची आहे . या नायिकेच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतार आलेले आहेत , तिच्या "पोरवयात 
नशिबाने तिच्या आयुष्यात ..हा "पोरखेळ " सुरु केला आहे. लेखिका साधना मोरे -आरोटे यांनी कथेतील "ती " ही व्यक्तिरेखा 
अतिशय चपखल शब्दातून उभी करतांना .."ती "च्या नशिबाचे भोग वाचून वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण केली आहे.

अशा कथेतील भावुकता कधी कधी अतिरंजित वाटण्याचा धोका आसतो आणि सगळीच कथा कृत्रिम वाटण्याचा संभव असतो ",
पण लेखिकेने  "पोरखेळ " कथेतील  "ती " ची दुर्दैवी कहाणी सांगतांना मनस्पर्शी लेखन शैलीत ही कथा   फुलवली आहे ".

पोरखेळ " मधली "ती " ही व्यक्तिरेखा ,मराठी सिनेमातील .." सोशिक -नायिकेची " आठवण करून देते ".

या कथेची सुरुवात -पाहू या -
जवळपास पंचाहत्तरी पार केलेली ती  !
पांढरे स्वच्ह नऊवारी पातळ , पांढरं स्वच्छ नीटनेटक पोलकं  आणि ...
..आणि पांढरं कपाळ....!
 हो .. असंच म्हणयचे त्याकाळी उपहासाने लोक...

लेखिकेने  -या पाच ओळीतच .. नशिबाचा "पोरखेळ " आणि त्या खेळाने जिचे आयुष्य उध्वस्त झाले ,
 त्या " ती " चे व्याक्तिरूप  वाचकांच्या डोळ्यासमोर उभे केले आहे.
 शब्द  किती अर्थवाही असतात "त्याचे हे उदाहरण आपल्या समोर ठेवावे  वाटले .
स्त्री विषयक सर्व भाव-भावना ..या कथेतून पाहण्यास मिळतात . जरूर वाचावी अशी ही कथा आहे.

लेखिका साधना मोरे -आरोटे यांना लेखन शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


२. कथा - अव्यक्त प्रेम , (पृ. ९९ ), ले- संध्या सु.हिंगे - गोवा 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्यांना त्यांचे इच्छित प्रेम मिळते ..ते नशीबवान असतात असे म्हणतात ", असे सुदैवी प्रेमी कमीच असतात म्हणून तर 
"प्रेमाची कोडे " सोडविणे अनेकांच्या नशिबात नसते . तसे पाहिले तर माणसाच्या आयुष्यात .."प्रेमाचे येणे " अकल्पनीय 
असेच असते . कधी योग्य वेळी तर कधी नको त्या वेळी " आयुष्यात प्रेम जडणे "  असे घडून जाते .

प्रस्तुतच्या
अव्यक्त प्रेम "या भाव-कथेतील अनुजाच्या वाटयाला आलेले प्रेम थोडे जगा वेगळेच आहे , म्हणूनच ते प्रत्यक्षात स्वीकारले जाणारे नाहीये ",
ही जाणीव ..अनुजाला आहेच ..कारण ते वास्तवातील कटू सत्य आहे. अनुजाची कहाणी वाचतांना आपल्याला हे कळून चुकते.
तेव्हा ..आपल्याला ..अनुजाच्या ..या -प्रेमाच्या भावने बद्दल वाटू लागते की.. खरेच ..माणूस कम-नशिबी असला की ..
सुख त्याच्या पासून लांब -लांबच राहते.

अनुजाच्या कथेतून लेखिकेने .. स्त्री - पुरुष  यांच्यातील  सुखाच्या बद्दल  -मन आणि शरीर , भावनिक आणि शारीरिक ..इच्छा आणि गरज , 
या बद्दल  वेगवेगळ्या दृष्टीकोनातून विचार मांडले आहेत ..
किती ही खुली जीवन शैली येवो , समाजिक - बंधनं " या नावाखाली ..
या सुखापासून  "एकट्या स्त्री ला  वंचितच ठेवले जाते , स्त्री या बाबतीत कधीच व्यक्त होऊ शकत नाही .. अव्यक्त भावना ..कधीच 
 बोलक्या करता येणार नाहीत ..हे  काटेरी सत्य .. मोठे बोचरे आहे.
लेखिका संध्या हिंगे ..यांची कथा नायिका -अनुजा . याच सामाजिक वातवरणात .रहाणारी आहे.
तिचे अक्त प्रेम ..ते सुद्धा .."एकतर्फी असलेले प्रेम",  कधी ही व्यक्त करू शकणार नाहीये .
अनुजाची ही अव्यक्त प्रेमाची शोकांतिका , वाचकांच्या लक्षात राहील अशीच आहे.

लेखिका संध्या हिंगे यांना लेखन -शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.
कथा - सैलोमन काका  (पृ..१०४ ), ले- राहुल अरुण घायमुक्ते - पुणे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखक राहुल अरुण घायमुक्ते .. यांची कथा ..उत्तम असे व्यक्ती -चित्रण आहे . त्यांच्या भोवती फिरणारी कथा ..,त्यातील 
सगळी वर्णने , मनोगत , निवेदक सांगतो त्यातून .. आपल्या डोळ्यासमोर .कथेतील सैलोमन काका " अगदी 
हुबेहूब साकारून येतात . 
अतिशय समरसतेने हे लेखन झाल्यामुळे ..सैलोमन काका ..ही व्यक्तिरेखा .रसरशीत आणि 
जिवंत वाटू लागते .

लेखक -राहुल घायमुक्ते यांची लेखन शैली अतिशय प्रवाही आहे..कथा ओघवती आहे ..त्यामुळे .कथा वाचतांना 
कथेतील ..मी , आणि सैलोमन काका यांच्या सोबत आपण ही त्या वातावरणातील एक भाग बनून जातो .
 आणि सैलोमनकाकांच्या सोबत त्यांच्या ऑफिसात , वाड्यात , जुन्या घरात , सध्याच्या रहात्या बंगल्यात जाऊन सगळे काही 
पाहतो . ...हा लेखन ओघ , वेगवान कथनक ..अनुभवण्यासारखे आहे.

माणूस .आपले आयुष्य जगतांना ..किती पातळीवर .एक व्यक्ती म्हणून वागत असतो ..त्याचा स्वभाव , त्याचे वेळोवेळीचे 
वागणे ,घेतलेले  विसंगत निर्णय ,त्याचा जीवन विषयक दृष्टीकोन , असे खूप काही ..
 काकांच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने अतिशय  सहृदयतेने रेखाटले आहे...ज्यातून माणूस कसा असतो  हे अनुभवणे खूप वेगळे आहे.

या कथेचा एकूणच बाजहा - "  माणूस , त्याचे  आयुष्य , जीवनानुभव " यावरती  चिंतनपर व्यक्त होण्यावर आहे , त्यामुळे ही 
तशी कथा गंभीर -आणि विचार-प्रवर्तक झाली आहे असे म्हणावेसे वाटते. 

"लाखो -करोडोंच्या संपत्ती पेक्षा  प्रेम ,आपुलकी  आणि मायेचे ते दोन शब्द  आपल्याला उंच झेपावण्यासाठी पुरेसे असतात ",
नाही तर लाखमोलाचा हिराही  त्याच कोळशाच्या खाणीत पडून रहातो .सैलोमनकाकांसारखा  !!
कथेचा हा शेवट ..कथेच्या चरित्र -नायकाला " खूप उंचीवर नेऊन ठेवतो.

लेखक -राहुल अरुण घायमुक्ते यांना लेखन शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लवकरच भेटू पुढच्या लेखात .अजून काही कथा बद्दल सांगेन.

#संवादिनीकथासंग्रहपरिचयलेख - भाग -८ वा . 
ले- अरुण वि.देशपांडे .
९८५०१७७३४२ 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख -भाग -७ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा . ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
कथालेखक - १. नितेश पाटील. २. तुषार नातू . ३. केदार विलास दिवेकर .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक मित्र हो-
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा . आजच्या लेखात  खालील तीन कथांचा आस्वाद -परिचय करून देतो आहे.
 
१. कथा - स्वप्न धुमारे - (पृ.८२ )
लेखक - नितेश ज्ञानेश्वर पाटील (नित ) -पालघर 
------------------------------------------------------------------------------------
लेखक नितेश पाटील यांनी "स्वप्न धुमारे "या कथेत ..मनाच्या अंतरंगात शिरून ..स्वप्न आणि त्या स्वप्नांची वैज्ञानिक 
स्वरूप ,मनाशी त्याचा संबंध अशी  चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.. 
.कथेची नायिका .."राघवी ", हिला कायम वाटत   असते की तिला पडणारी स्वप्न ", ही सूचक आहेत
..त्यामागची कारणे शोधणे तिच्या विचार- कक्षातले  नाहीये   .तिच्या विचारांना मर्यादा   आहेत "याची तिला जाणीव आहे., 
या स्वप्नाबाद्ल कुणाला कसे सांगावे ? या विचारांचे संकट  तिच्या मनावर गडदपणे असते.

राघवीला स्वप्नात जे काही दिसत असते..ते विचित्र आणि वाईट अशा स्वरुपाचेच असते. त्यामुळे तिची मनोवस्था उदासवाणी 
असते.. या तिच्या अवस्थेच्या वर्णनाने कथा सुरु होते . या वर्णनात  राघवीला नेहमीचा सुरूप - सुंदर असा नेहमीचा निसर्ग किती 
कुरूप दिसतो याचे वर्णन लेखकाने विरुध्द -स्वरूपाच्या प्रतिमा -शब्दातून केले आहे ..
जे खूप लक्षवेधी आणि मनात ठसणारे आहे.  नितेश पाटील यांची लेखन-शैली आकर्षक आहे हे या कथेतून जाणवते.

सतत पडणारी दु:स्वप्न तिला नेहमीच पूर्वसूचना देणारी आहेत असे वाटू लागते , पण, ती सांगितल्याने  ही स्वप्न ज्यांनी पाहिली नाहीत  ", 
लोकांचा संभ्रम कशाला वाढवायचा असाही प्रश्न तिला पडतो ..त्यामुळे तिला पडणारी स्वप्न आणि त्यातला अर्थ "दोन्ही तिच्या पुरते 
मर्यादित राहतात 
अशी मानसिक आणि वैचारिक गोंधळाची अवस्था ..असली म्हणजे व्यक्तीला स्वतःशी किती वेवेगळ्या पातळीवर मनाला 
सांभाळण्याची कसरत करावी लागते ." .हे अतिशय प्रभावीपणाने  "राघवी " या व्यक्तिरेखेतून लेखकाने दाखवून दिले आहे.
निसर्ग नियमानुसार ..आयुष्यची अखेर  होणे हे सर्वमान्यच आहे.. पण, हिरवे पान ..अकाली गळून पडणे ", त्याचे जाणे ..
हे यातना देणारेच आहे ना !   राघवी ची ही खंत , हे दु:क्ख या कथेतून सतत जाणवते. 

जाणीव -संपन्नमन " राघवीला एका विचाराप्रत आणून ठेवते ..तिच्या मनात होणारी वैचारिक जागृती , ज्ञान -विज्ञान निष्ठा "
या दोन्हीमुळे..स्वप्नांच्या -धुमाऱ्यातून बाहेर पडणे , मनाला पडणार्या प्रश्नांना बगल देत पुढे गेलेलं बरं .. हे तिचे स्वतःशी कबूल करणे "
खूप काही सांगून जाणारे आहे ".
नायिका - .राघवी ,तिची मैत्रीण शालिनी ..आणि दोघींचा विद्यार्थी पूर्वेश ..यांच्याबद्दल जाणून घेण्यसाठी 'स्वप्न धुमारे ही कथा 
जरूर वाचावी .
लेखक नितेश पाटील यांना लेखन शुभेच्छा .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा - २

शिर्षक - सिंड्रेला  (पृ..८७  )
ले- तुषार पांडुरंग नातू - नागपूर 
----------------------------------------------------------------
सिंड्रेला "ही अतिशय परिचित अशी जग-प्रसिध्द लोकप्रिय -स्वप्न -कथा आहे.  प्रस्तुतच्या संग्रहात .याच शीर्षकाच्या  कथेत .. सायली नावाच्या ."सिंड्रेलाची
हळवी  आणि भावूक प्रेमकथा .वाचावयास मिळते .
 सहजसुंदर लेखन शैलीचे लेखक म्हणून..तुषार नातू वाचकांना परिचित आहेत. त्याची प्रचीती या ही कथेतून वाचकांना येईलच.

सिंड्रेला " ही कथा .सायलीच्या आयुष्यात आकाशच्या रूपाने "प्रेम-भावना " येते . हे सगळे होण्यासाठी सायलीला ..मदत झालेली  आहे ती 
इंटरनेट - फेसबुक या माध्यमाची .
आकाशशी . मैत्र होण्या आधीचे सायलीचे आयुष्य आणि वास्तवातले जगणे ..तसे खडतरच आहे.. शारीरिक व्यंग असणे , अपंगत्व येणे "
या माणसाच्या दुर्दैवाने वाट्याला येतात .त्यात या व्यक्तींचा काही दोष नसतो . नशिबाचे भोग " म्हणत जगायचे ,
सायलीला .सावत्र आईच्या येण्याने ..सगळी दु:खः ,यातना , वेदना सोसाव्या लागलेल्या आहेतच.

आभासी जगात झालेल्या मैत्रीने सायलीचे आयुष्य बदलून जाते . कविमनाच्या सायलीला.आकाशच्या अनुरूप मैत्री मुळे.हवेहवेसे वाटणारे ,
पण..तिच्या सारख्या व्यंग असलेल्या ,अपंगत्व असलेल्या मुलीसाठी स्वप्नवत  वाटणारे आणि  अप्राप्य असे प्रेम आकाशमुळे मिळते 
पण, जेव्हा आकाश सायलीला 
समक्ष भेटेल , तिला पाहिलं  तेव्हा मात्र नक्कीच , सायलीचे खरे व्यक्ती-रूप "पाहून नक्कीच तो दुरावेल ..हे सायलीची भीती ...

 सायलीची ही व्याकूळ , हळवी भाव-व्यथा .. सिंड्रेला : कथेतून लेखक तुषार नातू यांनी अतिशय रोचकपणाने लेखन केली आहे.
त्यामुळे .... सायली "चे काय होणार ? या बद्दल वाचक  आस्थेने ही कथा नक्की वाचेल . सायली " सर्वार्थाने .."सिंड्रेला "म्हणून शोभते  .
छोटीशी असली तरी ..सिंड्रेला " कथा छान जमली आहे .
अशा  भावनिक कथा वाचकांच्या मनाला सहज भावून जातात .
लेखक - तुषार नातू यांना लेखन शुभेच्छा .

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 3.
कथा -
शिर्षक- काकपक्ष  (पृ. ९१  ), ले- केदार विलास दिवेकर - मुंबई 
------------------------------------------------------------------------------------------------------
संवादिनी कथासाग्रहातील मोजक्या अशा ..वेगळ्या ..धाटणीची "काकपक्ष " ही कथा ..यातील विषय परिचित आहे ,पण तो ज्या 
वेगळ्या पद्धतीने परिणामकारकरीत्या लेखकाने मांडला आहे ..ती पद्धत वाचकांसाठी नवी अशीच असणार आहे. 

पंचतंत्र -कथा , इसापनीती , चांदोबा .. आणि बालमित्रांच्या साहित्यातून आपल्याला
. बोलणारे पक्षी आणि प्राणी "नित्य भेटतात असतात . या स्वप्न-जगात बालमने  सहजतेने रमून जाणे .नैसर्गिक आहे.
 पण..केदार दिवेकर या लेखकाने .काकपक्ष " या कथेत .कावळा " आणि कावळ्यांची जमात ,कावळे-समाज , 
यांच्या  अव्यक्त भावनाना बोलते करून .. त्याचा संबंध थेट माणूस आणि त्याच्या समाजाशी जोडला आहे.तो विलक्षणआहे.

 पक्ष , पितृपक्ष , पक्ष - पंधरवडा " हे दिवस " माणसांच्या  भावनिक विश्वातले अतिशय महत्वाचे दिवस समजले जातात .
पारिवारिक कर्तव्य म्हणून म्हणा  हे पक्ष -कार्य  ..मनापासून आणि मनाविरुद्ध " "अस दोन्ही प्रकाराने करणारी माणसे दिसतात .
पक्ष " करणे ,आणि   पक्ष -कार्य " एकदाचे उरकून टाकणे ",  असे सर्व प्रकार " कसे होत असतात
.. हे या कथेतून वाचतांना कावळ्यांनी ..माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीवर बोचरे प्रहार केले आहेत , 
.
माणूस आणि त्याचा समाज , कावळे आणि कावळ्यांच्या समाज - यांच्या बद्दल लिहितांना .लेखक केदार दिवेकर यांनी  कथेत  .एक उपहासात्मक 
असे वातावरण उभे केले आहे असे म्हणावेसे वाटते 
, कावळ्यांच्या समाजाबद्दल कावळे जे व्यक्त होतात , त्यावरून  कावळे-समाज असो की  मानव-समाज " दोन्हीत साम्य आहे असे जाणवते 
 ..ते असे की .. सामुहिक जीवनावर , सामाजिक रूढी -  आणि परंपरा " यांचा विपरीत असाच प्रभाव असतो " आणि त्यातून "नवी पिढी 
कावळ्यांची असो की माणसांची .. .संघर्ष होतच असतो .प्रस्थापित -आणि विस्थापित " होणे हा त्याचाच परिणाम आहे.
कावळे आणि माणसांची ही "रूपकात्मक-कथा " माणसाला अस्वथ करणारी आहे.
छोट्याश्या कथेतून  मोठा आशय व्यक्त करण्याची किमया लेखक केदार दिवेकार यांना छान साधली आहे.

त्यांच्या लेखन-प्रवासासाठी शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनीकथासंग्रह - परिचय लेख  -भाग -७ वा .
  ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342

#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -ले- अरुण वि.देशपांडे
कथालेखक -१.राहुल दत्तात्रय राजोपाध्ये २. राहुल करुरकर  ३. मीनाक्षी आडे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुबेर समूह प्रकाशित .संवादिनी कथासंग्रहाच्या प्रस्तुतच्या परिचय लेखमालेमुळे ,या संग्रहाच्या वाचकांच्या संख्येत
लक्षणीय भर पडते आहे. हे जाणवले आहे.

याचे कारण म्हणजे..संवादिनी संग्रहातील कथासाहित्य वाचनीय आहे ",त्यासाठी 
सर्व वाचकांच्या वतीने मी पुन्हा एकदा 
या सर्व कथालेख्कांचे अभिनंदन करतो.

आजच्या या लेखात आपण ज्या कथांचा आस्वाद घेणार आहोत ..त्या कथांचे एक विशेष सांगावेसे वाटते ,ते म्हणजे-
 या तीन ही कथा अगदी वेगवेगळ्या विषयावरच्या 
आहेत . या कथा वाचून झाल्या नंतर वाचकांच्या मनात संमिश्र भावना दाटून येतील "असे मी म्हणेन.

कथा -१ 
शीर्षक - परतफेड 
ले- राहुल दत्तत्रय  राजोपाध्ये -सांगली 
-----------------------------------------------------------------------------------
पाउस आणि महापूर ही निसर्ग -आपत्ती तर आहेच . पण यात भर घातली आहे ती  माणसाने .आपल्या स्वार्थापोटी ,हव्यासापोटी माणूस जे काही 
करून ठेवतो आहे ..त्यामुळे हे संकट जीवघेणे होऊन बसले. ते कसे ?

लेखक राहुल राजोपाध्ये यांची  "परतफेड " ही कथा " याच विषयावर व्यक्त होणारी आहे. 
या कथेतील किशोर आणि सपना " हे  अतिशय सामन्य जीवन जगणारे जोडपे आहे,

 हलाखीचे जीवन जगणार्या किशोरच्या आयुष्यात  "सपना " येते आणि किशोर ..मोठी स्वप्ने  पाहू लागतो
 अधिक सुखाच्या मागे लागलेल्या किशोरच्या,लोभापायी ..त्याची सारासार विचारशक्ती काम करीत नाहीये ..हे पाहून 
सपना "त्याचे मन वळवायचा  प्रयत्न करते ..

अवैध धंदे ,त्यातील धोके ,त्यातून उद्भवणारे संकट ",याचा किशोर काही एक विचार न करता ..पुढे पुढे जातो खरा ..पण ,
निसर्ग आणि नशीब .यांचे तडाखे ..कसे आणि कधी बसतील ..हे सांगता येणे कठीण असते .

महापुरात ..किशोरचे सर्वस्व वाहून जाते , त्याची प्रिय पत्नी .त्याच्या डोळ्यासमोर महापुरात वाहत जाते,बेपत्ता होते , आणि 
पूर ओसरल्यावर महापूर-ग्रस्तासाठीचे शिबीर सोडून किशोर ..घराकडे येतो ...आणि पुढे ?

मानवी स्वभाव आणि मानवी वृत्ती ..यामुळे माणूस स्वतःचे जीवन किती धोक्यात आणतो ,याचे उदाहरण किशोर या व्यक्तिरेखेतून 
लेखकाने दाखवले आहे. "परतफेड " या शीर्षकात अजून एक अर्थ ..लेखकास सुचवायचा असावा ..असे मला जाणवले , तो म्हणजे.
जैसी करणी -वैसी भरणी " हा तो अर्थ .

किशोरच्या दुष्कार्माची परतफेड निसर्गाने केली खरी .पण..त्याची किंमत ? किती ?

आततायीपणे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या   किशोरला  सावरण्याचा प्रयत्न करणारी सपना  ,"
सपनाची   ही व्यक्तिरेखा मनाला खूप चटका लावून जाणारी आहे.  त्यासाठी किशोर-सपना "ची कथा वाचायला हवी.  

या कथेत .लेखकाने -महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वर्णन मोजक्याच आणि परीणामकारक शब्दात केले आहे.
ओघवती अशी लेखनशाली  लेखकास  लाभली आहे . त्यांच्या लेखनास हार्दिक शुभेच्छा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२.
कथा 
शिर्षक- मुराद 
ले- राहुल करुरकर - लंडन 
------------------------------------------------------------------
कुबेर समुहातील अनेक सदस्य हे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने  विदेशात वास्तव्यास आहेत .या पैकी राहुल करुरकर आहेत ,
.संवादिनी संग्रहात .वेगळ्या  विषयावरील ज्या काही कथा आहेत ..त्यातली .
राहुल करुरकर लिखित ."मुराद " ही कथा " ,तिच्या एकूणच कथा-रूपाने   वेगळी वाटणारी आहे.

अवयव -दान , अवयव -प्रत्यारोपण " हे  विषय माहिती होण्यास सहज-सुलभ नाहीयेत  ,याच विषयवार ही कथा आहे.
त्यात माहौल हॉस्पिटल , ऑपरेशन , ऑपरेशन -थियेटर " ,पेशंट,
रुग्ण , रुग्णसेवा , रुग्णाची नातेवाईक मंडळी " , डॉक्टर , त्यांचे निर्णय आणि मुख्य म्हणजे त्या त्या वेळी उद्भवणारी आणीबाणीची परिस्थिती  "
या सर्व गोष्टी ..लेखक राहुल करुरकर यांच्या कथेची परिणामकारकता इतकी वाढवतात की. 
या कथेतील -
आबिद आणि शायना हे एक जोडपे , आणि सतीश आणि अपर्णा  हे दुसरे जोडपे ", यांना ज्या भयानक परिस्थितीतून जावे लागते आहे, ज्या 
तणावाचा असह्य भार सहन करीत समोर आलेल्या संकटाशी सामना करायचा  , त्यातून मार्ग काढायचा आहे "
सगळ काही फारच कठीण वाटणारे ,मानसिक आणि भावनिक स्ट्रेस आहेत, त्यांची अवस्था कशी असेल ? 
वाचक सुद्धा या भयावह परिस्थितीचा साक्षीदार बनून ..आता पुढे काय होणार रे बाबा ..! असे नक्कीच म्हणेल.

आबिद-सायनाचा - जिगर का टुकडा "- मुराद ,, आणि सतीश -अपर्णाचा "बाळ " हे दोन अबोध नायक , या छोट्या जीवावर आलेले  मृत्यूचे सावट "
आणि अशा प्रसंगी .वागणार्या , विचार करणार्या माणसांच्या भवती .ही कथा केंद्रित होते .
.माणूस , त्याची वृत्ती , असाह्यता , हतबलता ,आणि चिवट आणि दुर्दम्य अशी आशावादी वृत्ती ',यांच्यावर .ही कथा व्यक्त होत जाते .

आबिद -शायना , सतीश -अपर्णा " यांच्यातील भावनिक आंदोलने " कथेतून येणारा एक अकल्पनीय अनुभव ठरावा .

कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा या भिन्न -धर्मीय व्यक्ती आहेत " म्हणून या कथेतला तणाव अधिक वाटणारा आहे का " ?
एक वाचक म्हणून मला असे वाटले नाही .

प्रसंगातून माणूस वेगळा दिसतो , वेगळा व्यक्त होतो   , माणूस म्हणून त्यांच्यातील भावना  त्याचे व्यक्त होणे " यातच या कथेच्या विषयाचे आणि आशयाचे  वेगळेपण आहे.

लेखक राहुल करुरकर ..याच्याकडून असेच सरस कथा लेखन होवो, यासाठी त्यांना लेखन -शुभेच्छा .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३.
कथा -
शीर्षक - घननिळा
ले- मीनाक्षी आडे- सुरत 
-----------------------------------------------------
ललित रम्य निबंध सुरुवात असावी अश्या ..घननिळा "कथेत .
आरंभी सुंदर  असे निसर्गवर्णन आहे , सर्व परिचित असा श्रावणमहिना ,
त्यातला श्रावण सोमवार , या निमित्ताने शिवभक्त ,शिवदर्शन , श्रावणात सोमवारी भरणारी यात्रा " असा श्रावण -महिमा वाचावयास  मिळतो .

या कथेचा  नायक आहे  "गजा "नावाचा किशोरवयीन मुलगा .
श्रावण-सोमवारची  यात्रा " कथेच्या  नायकासाठी खूपच महत्वाची आहे.   
 
आपल्या धाकट्या भावासाठी -राजू साठी , बहिण -चिमीसाठी .मोटर आणि बाहुली "घेणे "गजाच्या आवाक्याबाहेरचे असते ,पण गजा हार न मानता 
जत्रेतल्या  सोमवारी ..महादेवाच्या  मंदिरासमोर दिवसभर बसून राहतो .
.बेलपान आणि फुले " त्याचे पैसे जमा करून ठेवायचे पोते " हे दोन्ही सोडून तो अजिबात हलत नाही .

प्रतिकूल परिस्थिती माणसाला स्वप्ने पाहू देत नसते , मनातल्या इच्छा अपुर्या राहतात ,पण, म्हणून इच्छापूर्तीसाठी काहीच करायचे नसते का ?

 झगडत , संकटाशी  सामना करीत , अडचणीवर मात करून ..
आपल्या स्वप्नाची  पूर्तता होणे "इच्छा पूर्ण होणे "  हा झगडून मिळवलेला आनंद  काही वेगळाच असतो .

.हे सर्व मिळवतांना . गजाला काय काय भोगावे लागले  ?,काय सहन करावे  लागले  ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे ..  
.हार न मानता , चिकाटीने , प्रयत्न करीत रहाणार्या गजाच्या कथेत मिळतात .

लेखिका मीनाक्षी आडे..यांनी कथेतून ..गजाची वेगवेगळी भावना -रूपं खूप छान दाखवली आहेत. 
हिरमुसलेला गजा ,भूक लागल्यावर भाकरी नाही 
म्हणून खूप पाणी पिऊन पोटाला गप्प ठेवणारा गजा , 
गोळा केलेला बेल ,पोत्यात जमा केल्यवर पळून जातांना ,तारेचा काटा ,मांडीत घुसून 
रक्त निघाले तरी दुर्लक्ष करून पाळणारा गजा ,",   
 पैसे जमा झाल्याचे डोळे भरून पाहिल्यावर बाहुलीच्या दुकानाकडे पाळणारा गजा ".

ही कथा वाचल्यावर वाचक ... शाब्बास रे गजा " असे नक्कीच म्हणतील.

छान -नेटके असे लेखन "  लेखिका मीनाक्षी आडे  यांच्या अगोदर पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या  साहित्यातून वाचकांनी 
अनुभवलेले आहेच.
पुढील लेखन-प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  #संवादिनीकथासंग्रह -परिचय -भाग-६ वा -
ले- अरुण वि.देशपांडे  -पुणे.
9850177342 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------