Tuesday, May 22, 2018

पुस्तक परिचय - अरुण वि.देशपांडे . कविता संग्रह - "द्वैत " प्रा - योगिनी देगमवार , आश्वासक वाटचालीचा आरंभ ...! --------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख- 
अरुण वि.देशपांडे . 
--------------------------------------
कविता संग्रह - "द्वैत " 
 प्रा - योगिनी देगमवार ,
आश्वासक वाटचालीचा आरंभ ...!
-----------------------------------------------------------
 प्रा.योगिनी देगमवार या कवयित्रीच्या कविता .."द्वैत " या शीर्षकाच्या कविता संग्रहात आपल्याला वाचण्याचा योग आला आहे. विशेष म्हणजे कवयित्रीचा हा पहिलाच कविता संग्रह " आहे ,या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करून संग्रहाचे स्वागत करू या.
या संग्रहाच्या आरंभी कवयित्रीला .."आशीर्वाद आईचा " लाभला आहे.. आई कडून मिळालेल्या काव्य-प्रतिभेचा अविष्कार " आपल्याला या संग्रहातील कवितेतून झालेला आहे हे जाणवते.

कवयित्रीचे प्रेरणा -स्थान असलेले आदरणीय व्यक्तिमत्व डॉ.एस.व्ही .सालफळे यांची प्रस्तावना  "द्वैत "संग्रहाला लाभली आहे . कवितेबद्दल आणि कवयित्री बद्दल अतिशय आपलेपणाने व्यक्त होणारी ही प्रस्त्वाना वाचकांना या कवितेबद्दल खूप छान सांगणारी आहे. उदा -

"ह्या संग्रहातल्या साऱ्या कवितांचा प्रवास त्रिभुवानातून झालेला आहे . ह्या कवयित्रीला ह्या कवितांनीच चिंतन करावयास लावले आहे. तिनेच  "जग हे सुंदर , जगणे सुंदर " असा मंत्र दिला आहे. कृष्णाच्या भक्ती-गानातून एक सुंदर संगीत निर्माण झाले आहे .
कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता खिन्न्तेकडून प्रसन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या आहेत ..अंधारातून प्रकाशकिरणांकडे त्यांची धाव आहे " 
अशा संपर्क प्रस्तावने पाठोपाठ ..
पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने कवी श्रीपाद प्रभाकर जोशी यांचे मनोगत या संग्रहात समाविष्ट केलेले आहे..
कवी - श्रीपाद जोशी म्हणतात -
" द्वैत " या कविता संग्रहातून ..योगेश्वर कृष्ण अनेक कवितात विविध रुपात प्रबळपणे भेटतो  कृष्ण विषयक प्रीतीच्या अनुभक्तीच्या  या कविता लय, ताल, संगीत, नाद आणि शब्दकळेनं नटलेल्या आहेत..
.
"द्वैत " संग्रहाचा  ब्लर्ब - मजकूर  प्रा. राजेंद्र राऊत सरांचा आहे.. ते म्हणतात ..
या पहिल्याच काव्य संग्रहात बहुतांश कविता ह्या कृष्ण प्रेमात चिंब चिंब भिजल्यात.
श्रीकृष्णाशी संवाद साधतांना त्यांच्या शब्दाला भरते येते . नादमधुरता , शब्दांची लयबद्ध मांडणी , छोट्या शब्दातील आशयगर्भता वाचकांचे चित्त चोरते .
.कवीच्या पहिल्या संग्रहावर  इतके आश्वासक वाचायला मिळणे "खूप सुखद वाटणारे आहे. या दृष्टीने कवयित्री नशीबवान आहेत असे म्हणू या . 
"द्वैत " संग्रहातील कविता या नवोदित कवीच्या आरंभीच्या वाटचालीच्या पाउलखुणा असतील " असा अंदाज करून जर वाचू लागलो तर ..
आपला अंदाज चुकीचा ठरेल .कवयित्री योगिनी देगमवार यांचे कविता लेखन खूप आश्वासक तर आहेच  त्याच बरोबर त्यांची कविता आपली वाटचाल खूप दमदारपणाने करणारी आहे "  हे लक्षात येते.

कृष्ण-भक्तीपर रचना "या संग्रहात विपुल असल्या तरी .हा काही अध्यात्मिक किंवा भक्ती -कवितांचा  संग्रह नाहीये , इतर कवितांचा उल्लेख या ठिकाणी केला तर ..योग्य होईल असे मला वाटते.

कवयित्री योगिनी यांनी आपल्या कविता लेखनाबद्दल म्हटले आहे .."कधी थोडी वेगळी वाट चोखाळत , कधी आतील अभिव्यक्तीचा शोध घेत उत्स्फूर्तपणे मानवी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे ";
कविता लेखनाचा कवयित्रीचा हेतू स्पष्ट आणि प्रामाणिक आहे यात शंकाच नाही. 

तसे पाहिले तर या संग्रहातील त्यांच्या इतर कविता ..विषयाने फार वेगळ्या आहेत " असे म्हणता येणार नाही..पण या कवितेतून कवयित्री एक माणूस म्हणून तळमळीने व्यक्त होत आहे हे जाणवते . कवीने नुसते भाष्य केलेले नाहीये .तर त्यांच्या मनातील जाणीव, तळमळ  हे सगळे या कवितातून अभिव्यक्त  होते.

काही कविता उदाहरणे देतो...

स्त्री- जाणीवेची ही एक कविता ..
"बघू द्या तिला अंतर्मनात 
होऊ द्या काही बोध 
तिच्यातल्या " ती " चा 
घेउ द्या जरा शोध ,
नकोय आता तिला
कौतुकाची थाप 
समर्थ तिची ती 
स्वतंत्र तिच्या विश्वात ...( ती ..पृ. ८१ ),

स्त्री-मनातली दुर्दम्य आशावाद आणि स्त्री -शक्तीला आवाहन करणारी ,विस्वास देणारी ही एक कविता..

"चल उठ आदिशक्ती 
चल उठ नारायणी 
करण्या उद्धार तू जगाचा 
चल घे भरारी गगनी 
चल घे भरारी गगनी .....( चल  घे भरारी गगनी ..पृ..७३.), 

पाउस आणि शेतकरी , शेतकर्याचे जीवन आणि पाउस , पावसाच्या लहारीपानाने उध्वस्त झालेल्या शेतकर्याचे दुखः कवयित्रीचे पण दुक्ख होऊन कवितेतून करुण-विनवणीच्या कवितेतून  व्यक्त होते..
" अरे पावसा पावसा 
  आता एकच मागणे 
 बळीराजाचे संपव आता 
  हे लाचारीचे जिणे..... ( अरे पावसा पावसा ..पृ. ७० ),

एका शिक्षकाच्या ,गुरु आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मुलांना , नव्या पिढीला आपण सांगितले पाहिजे ..कवयित्री आपलेपणाच्या शब्दातून मुलांना सांगते..पालक आणि बालक दोघांनी लक्षात ठेवावा असा हा मोलाचा संदेश आहे..

अभ्यासात हुशार म्हणजेच हुशारी नसते 
चित्र रेखाटण्याची कला देखील एखाद्यात असते 
रंगबेरंगी रंगांनी ,रंगवा जीवनाला 
कधीच लेखू नका कमी स्वतहाला ....( मुलांनो एकच सांगायचंय ... पृ.६५ ),

स्त्री -आणि तिच्या शिक्षणासाठी आयुष्यभर लढत राहिलेल्या "माय - सावित्री "बद्दल ची कविता ..
" सावित्री तू माय आमुची 
   लढलीस आमच्यासाठी 
   ज्ञानामृत हे शिक्षणाचे 
 लाविले आमच्या ओठी .... ( सावित्री ..पृ.५३ ),

मानवाच्या ठायी माणुसकी असावी , मानवतेचा विशाल  अशा दृष्टीकोनातून ..कवयित्री मानवतेची लेणी शब्दातून साकारते आहे ..ही तळमळ मोठी भावणारी आहे..

" जाती, पंथ , धर्म सोडुनिया सारे 
शब्द हीच लेकुरे कवितेठायी 
चला पाहू आता बंधने तोडूनी 
मानवतेची लेणी कवितेमाजी ...(पृ..४२ )...,
ही झाली इतर कवितांची उदाहरणे ... "

 द्वैत " कविता संग्रहाचे खरे आकर्षण आहे ते.. कृष्णमय कविता . 

कृष्ण-भक्ती , कृष्ण प्रीती , आणि  कृष्ण-भक्ताच्या भक्ती-भावाचा अतिशय उत्कट , हृदयंगम असा शब्द-अविष्कार कवयित्री योगिनी देगमवार यांच्या काव्य- रचनेतून होतो.
कृष्ण -मिलन, कृष्ण -विरह .हा कृष्ण -आणि गोपी यांच्यातील भक्ती-नाते बंध ..या नात्यांचे विलक्षण असे भावूक दर्शन कवयित्रीच्या रचनेतून होते..

आजच्या भीषण अशा वर्तमानात कृष्णाला .."एकदा परत ये " अस बोलावणे किती महत्वाचे आहे..ते पहा..

" तुझ्या वस्त्रांची लांबी वाढवावी लागेल तुला 
  किती तरी पांचाली आज भोगतायत मरणकळा.....( एकदा परत ये ..पृ.२० ),

रसिक हो ..कवयित्री योगिनी देगमवार यांच्या कविता संग्रहाने खूप छान कवितांचा आस्वाद-आनंद दिला , अशा छान कविता-लेखनाबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखन-प्रवासास शुभेच्छा.

या संग्रहाचे अनुरूप मुखपृष्ठ करणारे कलावंत चंद्रपूरचे श्री.सुदर्शन बारापात्रे यांचा उल्लेख करावा लागेल.

"द्वैत " काव्यसंग्रह ..अमरावतीच्या मेधा पब्लिशिंग हाउस व प्रकाशक संजय रा.महल्ले यांनी प्रकाशित केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क- ९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------
द्वैत -
(कविता -संग्रह )
पृ.८८ , मूल्य- रु. ८० /-
प्रा.योगिनी देगमवार -चंद्रपूर 
संपर्क - ९९७०१५५२७८ 
---------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक -
मेधा पब्लिशिंग हाउस - अमरावती 
संपर्क -९४२३६२२६६७ 


---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय लेख – अरुण वि.देशपांडे भावूक व्यक्तिचित्रणे – “सावलीची झाडं “

पुस्तक परिचय लेख –
अरुण वि.देशपांडे
भावूक व्यक्तिचित्रणे –
“सावलीची झाडं “
जेष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे .म्हणजे ललित –लेखनाचे मनोरम असे उदाहरण आहे ,लेखकाला अनेक व्यक्तींचा सहवास लाभला , हा सहवास लेखकाला सर्वार्थाने एक संपन्न-माणूस “ बनवणारा ठरला आहे , सहाजिकच या व्यक्तीविषयी लेखकाच्या मनात आदरभाव आहे, एक कृतज्ञता आहे . लेखक चंद्रकुमार नलगे यांच्या लेखनाचा भाव -उत्कट असा अविष्कार  “सावलीची झाडं “ या लेख –संग्रहात झाला आहे.
एकूण १४ व्यक्ती-चित्रे या संग्रहात आहेत. लेखकाच्या वैयीक्तिक आयुष्यात या सर्व व्यक्तींना आदराचे स्थान तर आहेच आहे , या शिवाय या व्यक्तींनी लेखकाच्या मनावर अनेक संस्कार केले आहेत , हे संस्कार लेखकाला आपण एक “माणूस “ होऊनच जगायचे आहे “,याची जाणीव करून देणारे आहेत . व्यक्ती आणि सहवास “हे व्यक्तिमत्व जडण-घडण होण्या साठी किती महत्वाचे असतात “ याची जाणीव प्रस्तुत संग्रहातील लेखांमधून येते .
दीर्घ असा जीवनपट या लेखनातून लेखक मांडतात ,हे वाचत असतांना त्या त्या काळातील संदर्भ आपल्याला खूप काही सांगणारे वाटतील , एक सांस्कृतिक आणि समाजिक असे दर्शन या लेखनातून नक्कीच होते . 
साहेब आणि मी “,-
– महाराष्ट्राचे नेते,माजी उपपंतप्रधान , रसिकाग्रणी , विचारवंत  साहित्यिक नाम.यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दल आठवणी सांगितल्या आहेत ..लेखकाच्या एकूणच आयुष्य-प्रवासात मा.यशवंतराव चव्हाण यांच्या सह्वासातील दिवसांना असलेले असाधारण असे भावनिक महत्व “,. विद्यार्थीदशेतील दिवस, अडचणीच्या वेळी चव्हाणसाहेबांनी दिलेला मायेचा आधार ,याबद्दल लेखक अतिशय भावुकपणे व्यक्त होतात .
लेखक , प्राध्यापक अशा दोन्ही भूमिकेतून वावरत असणार्या चंद्रकुमार नलगे यांनी सातत्यानी अनेक उपक्रम राबवले “,या सर्व उपक्रमासाठी मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांचे आशीर्वाद लाभले , चव्हाणसाहेब आवर्जून नलगे यांच्या उपक्रमाना आवर्जून उपस्थित राहिले “,हे दिवस लेखक कसे विसरू शेकन ?
उमेदीच्या धडपडीच्या दिवसात मा.यशवंतराव चव्हाणसाहेबांच्याबद्दल – लेखक म्हणतात..
“साहेबांना धडपडणाऱ्या मुलांबद्दल खूप आत्मीयता होती त्यांना ते कधी विसरत नसत “,
“बलदंड हिमालयाच्या सरंक्षणासाठी धावून जाणारा कणखर सह्याद्री , कृष्णाकाठची अस्सल अस्मिता ,आपल्या महाराष्ट्राचेच काय , भारत देशाचेही भविष्य उज्ज्वल घडावे म्हणून द्रष्टेपण जपणारा थोर शासनकर्ता, समाजनिष्ठ धारणेचा विचारवंत ,उपेक्षितांविषयीव दुर्लाक्षितांबद्द्ल करुणा असणारा माणूस म्हणजे साहेब.
मा.साहेबांचे सगळ्या लहान थोरावर प्रेम होते , विशेषतः स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाईवर तर खूप जीव होता. नवं हेरत ,पारखत ,त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत . तो दीप मालवला नाही, तो प्रत्येकाच्या अंत:करणात तेवत राहिला आहे.
साहेबातील माणूस “ लेखकाने खूप छान शब्दात व्यक्त केला आहे .. 
संग्रहाच्या आरंभीचा हा लेख वाचून वाचकांच्या मनात पुढील लेख वाचूया असे वाटणे साहजिक आहे ,याचे कारण ..ओघवत्या शैलीतील या आठवणी नलगे सरांनी खूप आपलेपणाने सांगितल्या आहेत ,आपण एक वाचक न राहता .नलगेसरांच्या परिवारातील एक सदस्य होऊन जातो “.
रवींद्रनाथांच्या साक्षीनं “, या लेखात लेखकाने वाचकांना त्रिपुराची सुंदर सहल घडवली आहे नलगेसर त्यांच्या दादाबद्दल म्हणजे पद्मश्री डी.वाय .पाटील यांचे बद्दल लिहितात –“ त्रिपुराचे राज्यपाल ,एक शिक्षणमहर्षी ,सकळ जनांचे कैवारी ,निगर्वी महंत, असंख्यांची सावली “ ,
अगदी समर्पक शब्दात व्यक्त होणे नलगे सरांना खूप छान जमते “ हे या संग्रहातील सर्वच लेखनात जाणवते , यामुळे हे व्यक्तिचित्रे अधिक ठळकपणे आपल्या समोर आकारून येतात , नलगे सरांच्या लेखनाचे हे एक छान वैशिट्य आहे.
या संग्रहातील लेखनशैली साधारण लेख " अशी नाहीये , प्रत्येक लेख एकाद्या ललित निबंधाची सुरुवात वाटावी अशी आहे,  जीवन विषयक तत्वज्ञान , निसर्गवर्णन , कधी गहन-गंभीर वाटावे असे आत्म-निवेदन ", असा आरंभ करून लेखक आपल्या व्यक्तीविषयी व्यक्त होत जातात ..त्यांच्या मनाचे हे उलगडणे वाचकांना खूप भावणारे असेच आहे.
प्रसिध्द साहित्यकार प्राचार्य रा.रं.बोराडे सर यांच्या बद्दलचा लेख " एक मनस्वी स्नेही ",व्यक्ती-रूपातील अनेक पैलूंचे घडणारे हे दर्शन लेखकाने अतिशय स्नेह-भावनेने केले आहे.
लेखक चंद्रकुमार नलगे यांनी स्वतःच्या कथेवर निर्माण केलेला "अंगाई " हा चित्रपट ,त्यानिमित्ताने त्यांना आलेले अनुभव संग्रहातील अनेक लेखातून आलेले आहेतच , या ओघाने असलेला  "साधुत्व " हा लेख .. मराठी चित्रपट सृष्टीतील थोर कला-दिग्दर्शक  बळीराम बीडकर " , यांच्याबद्दल रसिकांना फारशी माहिती नसेल , पण लेख्कामुळे "बीडकर साहेब" वाचकांच्या पर्यंत पोंचले . "साधुत्व " हा लेख खूप छान झाला आहे.
संग्रहाचे शीर्षक आहे ..सावलीची झाडं ", या संग्रहात एक लेख आहे - सावलीचं झाड ",
कवी-वामन होवाळ ", यांच्याबद्दलचा अतिशय मनस्पर्शी मनोगतून लेखक व्यक्त होतात ."वामनरावांच टवटवीत मन , निरागस अंत:करण, त्यातील असलेला कळवळा माझ्यासारख्या खेड्यातल्या मातीत रमलेल्याला नवा जोश देणारा असतो. त्यांच्या या शुभेच्छांनी पिढ्याच्या पिढ्या घडलेल्या आहेत. मनाचा स्वच्छ नि नितळ माणूस म्हणजे वामन होवाळ ..".सर्वांना आपला वाटणारा माणूस.
सावलीची झाडं " संग्रहातील अन्य व्यक्ती-चित्रांची शीर्षक अशी आहेत..
" रामबापू "(पृ.२१ ), स्वप्न " (३९ ) , "आनंदी आनंद " (पृ.५६ ), दिबा ",(पृ.६६ ), "नाथ पंढरीचा (पृ,७७ ), ""नामा म्हणे ", (पृ.९५ ), "पंत " (पृ.१०३ ), "माझे दादा .(पृ..११५ ),आणि " ज्वाळा " (पृ.१२५ ).
"सावलीची झाडं " हे लेखन स्नेहभावाने ओतप्रत भरलेले असे लेखन आहे , मित्र-जिव्हाळा , पारिवारिक जिव्हाळा , प्रेम, श्रद्धा , विस्वास , जीवनविषय निष्ठा आणि आयुष्यातील चढ-उतार करतांना मनाच्या ठायी असलेली दुर्दम्य इच्छा ",असे अनेक भाव-रंग या लेखनात आहेत ,जरूर वाचावा असा हा संग्रह आही.
लेखक चंद्रकुमार नलगे यांचे साहित्य वाचकप्रिय आहेच ,त्यांच्या या साहित्यकृतीला नेहमीप्रमाणे वाचक भरभरून प्रतिसाद देतीलच . सरांना शुभेच्छा.
मुखपृष्ठ चित्रकार आहेत अविनाश कुंभार , आणि शिवशाहीर राजू राउत यांची रेखाचित्रे या सजावटीने संग्रह आकर्षक झाला आहे.
प्रकाशक दादासाहेब काका जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशनने हा संग्रह प्रकाशित केला आहे. 
-------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------
ले- चंद्रकुमार नलगे 
संपर्क- ९८९०४११३२३ 
----------------------------------------------------
सावलीची झाडं 
(व्यक्तिचित्रे )
पृ. १३६. मूल्य-रु.१७५ /-
प्रकाशक - 
तेजश्री प्रकाशन ,
संपर्क- ८२७५६३८३९६ 
-------------------------------------