Thursday, December 22, 2016

पुस्तक परिचय लेख- काव्यानंद "काव्यसंग्रह.

पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
-------------------------------------------------------------------------------
रसिक हो नमस्कार ,
कवितेची आवड असणारे रसिक वाचक आणि कविता लेखनाची आवड असणारे कवी .यांच्या भेटीचा आनंदयोग जुळून आलाय तो  फेसबुकवरील सर्वपरिचित समूह "काव्यानंद प्रतिष्ठान "यांच्या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या उपक्रमामुळे .समूह - संचालक श्री .सुनील खंडेलवाल आणि त्यांचे सहकारी .यांचा कविता-विषयक जिव्हाळा "काव्यानंद   संग्रहामुळे पुस्तकरूपाने सिद्ध झालेला आहे.याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
यातील सहभागी कवी इंटरनेट व फेसबुक या माध्यमातून आपापल्या कविता-लेखनाने वाचाकंना परिचित झालेले आहेतच त्यांच्या कविता हाच त्यांचा परिचय आणि त्यांची ओळख आहे असे म्हणूयात.

कविता हणजे मनाची अभिव्यक्ती असते..कवी एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती  म्हणून समाजात वावरतांना अनेक जीवनानुभव घेत असतो  त्याचे संवेदनशील कविमन  कवितेतून व्यक्त होत असते .जीवन -अनुभवणे  किती वेगवेगळ्या पातळीवरचे असते ".हे कवीची कविता सांगत असते ."
याची प्रचीती या संग्रहातील कविता नक्कीच देतात.

काव्यानंद - संग्रहात  अनेक कविमित्र आपल्या कवितेतून व्यक्त झालेले आहेत "एका अर्थाने .हे"कवितेचे प्रतिनिधी आहेत ",अनेक भाव-भावनांच्या कविता यात  वाचावयास  मिळतात .सामाजिक  वैचारिक ,प्रेम- वात्सल्य या भावना,   ,निसर्ग  आणि माणूस "यांच्यातील नाते " अशा विविध विषयावरील कविता आहेत."याशिवाय "आई" हा सर्वप्रिय  विषयावर देखील कविता संग्रहातील कवींनी केल्या  आहेत .

कवी आशावादी असतो असे म्हणतात .कारण जीवनातील श्रेयस त्याला अपेक्षित असते ..अशा "आशावादी कविता "या संग्रहात आहेत.त्यामुळे .निराशेचा तीव्र असा सूर "या कवितेत आहे असे फारसे जाणवत नाही.
सहभागी कवींच्या सर्वच कविता मी मनापसून वाचल्या ..आणि जाणवले .हे मित्र उत्तम लेख्न-क्षमता असलेले कवी आहेत,हा संग्रह म्हणजे  त्यांच्या कवितेचा आणि प्रतिभेचा आरंभिक -अविष्कार आहे..म्हणूनच ..अधिक सराव आणि अभ्यासाने त्यांनी जाणीवेने कवितेने लेखन चालू ठेवल्यास ..त्यांच्या कविता अधिक सकस होण्यास नक्कीच मदत होईल.

सहभागी कवी आणि कवियत्री यांची संख्या लक्षणीय आहे ..त्यासाठी कविता संख्या - असे नियोजन आहे .सर्वच कवी -मित्रांच्या कवितांचा इथे सविस्तर उल्लेख करणे सहज्तेचे नाहीये .
मला भावलेल्या काही कविता अंश देतो आहे ..त्यावरून संगर्हतील कवितांचे आशय-स्वरूप याची कल्पना येऊ शकेल.

१. फुलत्या कळीन न खुडणे 
    पाळावया हे बंधन आहे 
क्रांतीज्योती सावित्रीला ,
हेच खरे तेंव्हा वंदन आहे....(सावित्री....अनिल लांडगे , पृ.३ )..
२.
 "निसर्गाचे अनेक अविष्कार आहेत
त्यातील एक अनमोल अनुभूती,कलाकृती
म्हणजे पौर्णिमेच्या रात्रीचे सुरेख आकाश ......(पौर्णिमेच्या रात्रीचे आकाश -सौ.अनिता सास्तूरकर ,पृ.८ ),
३- आई असे प्रथम गुरु
    तिचे बोट पहिली काठी 
    तिच्या स्पर्शाने आयुष्य सुरु
    प्रत्येक जन्म अपुरा आईच्या सेवेसाठी ...(आई ...संजय पाटील , पृ..२१ )

४."वीज नभातून आज गर्जते 
आकाशाचे गूढ गाणे 
 अमृत होवुनी अवनीवरती 
  बरसतात नवे तराणे ...(अमृतधारा ..विवेकानंद पोटे, पृ..२२ ),
५."थोरामोठ्यांना नमस्कार
    ह्यांच्या हिशेबात नाही बसत 
    वृद्धाश्रमात त्यांची अडमिशन
    करतात मात्र हसत हसत .....(बदल - अशोक कुमावत , पृ- २७ )
६. तुझ असणं नसणं 
    मजसोबत जोडलेल आहे
    कारण तू आणि मी 
    आता एकच आहे ....(अस्तित्व ..प्रकाश साळवी , पृ- २८ ),
७. तुझ्यामुळेच आई
    जगाला माझी जाणीव आहे
    रोज मात्र जगतांना 
    सतत तुझी उणीव आहे ...( आईची माया - सुनील  खंडेलवाल , पृ-४५ )
८. "कारण मी विसरते नेहमीच 
     तू आहेस क्षितीजपल्याड 
      अन मी तुझ्या आठवा सोबत 
       एकटीच क्षितिजाअल्याड...(क्षितिजा पल्ल्याड,- राणी कदम , पृ.६३),

९.  दर्द जीवाला तूच दिला, साह्ण्याचे बल तूच दिले
     दु:खः जरी खोल दरी , पंखी उरी बळ तूच दिले ...(मन माझे तुझ्या स्मरणात ..निसर्ग विश्व , पृ.६६),

१०." मनातल्या मनातही 
      वसे शब्दांचेच गाव
      जसे कोरून राहते 
      तुझे हृदयात नाव ..( काही शब्द साधे सोपे -  ऋचाकर्वे , पृ- ७२ ,)

११. विनंती माझी सर्व मातांना , आठवा आपली आई व बाळपण
      जाणून घ्या भावना लेकरांच्या व समजून घ्या त्यांचे कोवळेमन ...(कोवळे मन ..गीता विस्वास केदारे , पृ ७९),

आणि ...
या शिवाय काही कवींच्या कविता शीर्षकाचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
१.-विवेकाचा आनंद जन्माला - मंजिरी पांढारकर , २. लेक वाचवा - सौ.अनघा पतके ,  ३. ओसाड - कमलेश शिंदे , ४.चामड्याची कुलपं - सुनंदा पाटील 
५- वसंत ऋतूत - धनंजय पाटील ,
६ -राधा कृष्ण -प्रियांका कुलकर्णी  , ७ -मन- सौ.अनुपमा जाधव ,
८ -पोलीस- कविता शिंदे , ९  -व्यसन - शैलजा वायझडे, ,१० नयनी नभ दाटला - सुनील बिराजदार 
११ -आई - निवेदिता गवई, १२ -प्रयत्नांती परमेश्वर - सुनिता महाबळ.
१३ सोबत- सुरज ,१४  विचाररूपी सुंदर फुल -श्रद्धा जोशी.१५  क्षण गहिवरला - भालचंद्र बालटे. १६-पिता- मनीषा भुरके मोकाशी- मनस्वी कविता.

जेष्ठ कवी-संत -चित्रकार .श्री.वि.ग .सातपुते -तथा विगसा (अप्पा )-यांच्या भावकविता या संग्रहाचे आकर्षण आहेत ,,या सर्वांच्या सोबत माझ्या कविता आपल्या अभिप्रायार्थ देता आल्या याचा मला आनंद वाटतो.
शेवटी एक महत्वाचे - 
 या कवितेची समीक्षा व त्यावरची टीका " यांचे  इथे प्रयोजन नाहीये ..पण याचा अर्थ असा नाहीये की. या निकषावर या संग्रहातील कविता पास होतील ", .. स्वतहा कवींनी त्या दृष्टीने विचार करावा 
तूर्तास -सर्वांना लेखन शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
----------------------------------------------
कविता आनंद देणारा प्रातिनिधिक कविता संग्रह -
"काव्यानंद "
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाशक - सुनील खंडेलवाल 
काव्यानंद प्रतिष्ठान -पुणे 
संपर्क - ८८०५०११९७४ 
मूल्य-रु.१२५/- पृ- ९८ 
------------------------------------------------------------------------------

Thursday, December 1, 2016

पुस्तक-परिचय - "हास्यगाथा "

पुस्तक परिचय - "
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------
हास्यगाथा "- बहारदार विनोदी लेखन .
---------------------------------------------------------------------------
विनोदी -- लेखनाची उत्तम भट्टी जमली आहे  ",याची दणकेबाज प्रचीती आपल्या हास्यरसायन "या पुस्तकातून देणारे लेखक म्हणून शीलवंत वाढवे प्रसिद्ध आहेतच ,
.तसे पाहीलेतर  - .हास्यरसायन "या त्यांच्या" पहिल्याच कथा संग्रहाला -राज्य शासनाचा -  २००९-१० चा "दत्तू बांदेकर -हा विनोदी लेखनासाठीचा राज्य पुरस्कार" -प्राप्त झाला आहे.

अशा या लेखकाचे विनोदी लेखनाचे दुसरे पुस्तक "हास्यगाथा " नुकतेच प्रकाशित झाले आहे 
सहाजिकच प्रस्तुतच्या लेखनातून हमखास विनोदी शैलीतले लेखनवाचण्यास  मिळणार",  या अपेक्षेने वाचक हे पुस्तक हातात घेणार ..मग, .त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणारे असे हे बहारदार विनोदी लेखन आहे" हे अगोदरच सांगावेसे वाटते.

"हास्यगाथा "- या विनोदी कथा संग्रहाच्या निमित्ताने वाचकांचे दोन फायदे झाले आहेत ते असे..
१.छान ,हलक्या-फुलक्या आणि मिस्कील विनोदी कथा वाचावयास मिळणार  हे तर आहेच , त्या सोबत ,भारदस्त असा -शब्द-बोनस मिळालाय .
२.डॉ. श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना  आणि जेष्ठ लेखक श्री.बाबाराव मुसळे यांचा अभिप्राय ,या स्वरूपात .
या दोन गोष्टी मुळे एक महत्वाचा फायदा असा झालाय  की..हास्यागाथा "मधील विनोदी लेखनाकडे बघण्याचा एक वेगळा  दृष्टीकोन वाचकास लाभतो आणि या लेखनास अधिक न्याय मिळतो "हे खूप महत्वाचे आहे असे सांगावेसे वाटते.असो.

प्रस्तुतच्या संग्रहात एकूण १२ कथा आहेत .यातील कथा आहेत "असे वाटणारे जसे काही लेख आहेत .तसेच काही लेख -कथा असल्याचा भास नक्कीच होईल.विनोद निर्मिती "हेच या लेखनाचे प्रयोजन आहे ..मग त्यासाठी जे रसायन लागते ..तो सगळा कच्चा माल " आणि त्यासाठी जमवावी लागणारी भट्टी " ही कुशलता लेखकास चांगलीच अवगत झालेली आहे. अशा प्रकारच्या लेखनास आवश्यक असलेली लवचिक शब्द्शैली ..लेखकास लाभलेली आहेच . .त्याचा पुरेपूर असा सफाईदार वापर या लेखनात केलेला आहे .
वर्तमानातील वास्तव ..आणि त्यातले त्याचे संदर्भ यांचा विनोद निर्मितीसाठी वापर करून घेता येणे "हे तसे सोपे काम नाही .कारण त्यातील अर्थ-निर्मिती विनोदास पूरक ठरवण्यासाठी  त्यातील विसंगती अचूकपणाने  टिपता येणे " हे नेमकेपणाने साधता आले तरच त्यातून  अपेक्षित विनोद निर्माण होईल अन्यथा हास्य-निर्मितीचा प्रयत्नच "हास्यास्पद "ठरण्याचा मोठा धोका लेखकाच्या समोर असतो .आपल्या लेखनाचे असे काही होणार नाहीये"  याचे अवधान जपणे  "या हास्यागाथा " चे लेखक शीलवंत वाढवे यांना छान जमले आहे .

ग्रामीण -जीवनाचा अनुभव घेत जगणारा हा लेखक आपल्या लेखनातून "नागरी जीवनमानाचे चित्रण करतांना .त्याच शब्दांचा वापर .विनोद निर्मितीसाठी करतो .त्यामुळे या लेखनातून एकाचवेळी ग्रामीण व नागरी अशा दोन्ही जीवनाचे जे चित्रण घडते .ते लेखकाच्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे दर्शन आहे. तसे पाहिले तर .आपल्या दैनंदिन व्यवहारात   जेजे शब्द सर्रास आणि सहजतेने बोलले जातात त्याचाच वापर या लेखनात आहे..यातील व्यक्तिरेखा तीच भाषा बोलतात जी नेहमी आपल्या कानावर पडते . म्हणजेच असेही म्हणता येईल की ..बोलण्याच्या भाषेतून .शब्दातून लेखकाने विनोद निर्मिती केली आहे .
प्रसंगनिष्ठ विनोद , व्यक्तीनिष्ठ विनोद हे तर या लेखनाचे वैशिष्ट्य आहेच त्यापेक्षा या लेखकाची निवेदनशैली जास्त प्रभावी आहे ..याचे कारण हे  लेखक एक कलाकार आहेत , सादरीकरण कसे करायचे असते याची त्यांना उत्तम जाण आहे ..त्यामुळे त्यांच्या कथा ते वाचकासमोर जणू सादर करतात "असे वाटावे अशी सांगण्याची त्यांची पद्धत आहे.खुलवूनसांगणे,  ते अधिक रंजक -स्वरूपात सादर करणे .याचा मोठाच लाभ या संगर्हातील लेखनास झाला आहे.

या लेखनात उपहास आहे ,उपरोध आहे ..बोचरा उपदेश आहे ..चांगले तेच अधिक चांगले कसे आहे ",हे पटवून देण्यासाठी "वाईट गोष्टीला ठळक दाखवून " जनमानसात त्याचा कसा प्रभाव असतो" हे अनेक कथातून लेखक सांगतो.सामजिक कार्य ,सार्वजनिक जीवनातील घटना  या बरोबरच एक व्यक्ती म्हणून या सर्वांचा त्यातील वर्तन-सहभाग ..याचे खुमासदार शब्दरूप म्हणजे हे कथा -लेखन असे म्हणता येईल.
यातील कथानायक .स्वतहाचे स्वतंत्र असे जीवनविषय तत्वज्ञान अनेकवेळा सांगतो ..त्यातून इष्ट-अनिष्ट  याचीच नेमकी चर्चा उपरोधिक मनोगतातून व्यक्त केली जाते ."आत्मा-परीक्षण "असेही करता येते " याचा शोध रंजक आहे.

प्रस्तावनेत या संग्रहातील कथांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेलाच आहे",त्यावर इथे अधिक भर ती काय घालावी.
काही  कथांची शीर्षके -वानगीदाखल सांगतो-
१.निवडणूक (पृ.३१), २.तंटामुक्ती -(पृ-५७ ) ३- पासबुक, फेसबुक  आणि स्मार्ट माणूस -(पृ.१११ )
लेखक ग्रामीण भागातील प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विषयावरील कथांमधून त्यांच्यातील लेखकास अधिक प्रभावीपणाने लेखन करता आलेले आहे हे जाणवते ..त्या कथा -अर्थातच उत्तम झाल्या आहेत.
१.पटपडताळणी - (पृ.१ ), आणि २.शाळा (पृ.३७)..यांचा उल्लेख करावा लागेल.
एकूणच हे लेखन विनोदी आहे हे तर खरेच ..त्याच बरोबर एका  चिंतनशील  व्यक्तीमत्वाने आजच्या विपरीत वर्तमानावर केलेले भाष्य आहे जे विचार करण्यास भाग पाडते.
अंतर्मुख करण्याचे विलाक्ष्ण असे सामर्थ्य विनोदी लेखनात असते" याची प्रचीती "हास्यागाथा " मधून नक्कीच येते.
लेखक शीलवंत वाढवे यांना आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हास्यगाथा 
(विनोदी कथा संग्रह )
शीलवंत वाढवे 
मो-७३५०८४८१२२ 
पृ.१२४ ,मूल्य- रु.१४०/-
प्रकाशक -
आत्मभान प्रकाशन -औरंगाबाद ,
मो-९४२२८६३६६५ 
-----------------------------------------------------------------------------------