Friday, July 18, 2014

पुस्तक-परिचय -lलेख- माझी फेसबुकगिरी

पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-------------------------------------------------------------------------
आभासी दुनिया आणि वास्तवातील दुनियेचा
धांडोळा घेणारे ललित रम्य लेखन -!
"माझी फेसबुकगिरी "-
----------------------------------------------------------------------------------------------------
 श्री .सचिन मधुकर परांजपे - लिखित  "माझी फेसबुकगिरी ", हा लेख-संग्रह नुकताच
वाचण्यात आला .
"फेसबुक " या मायानगरीत आनंदाने रमणारे असे प्रचंड आहेत.या माध्यमातून
आपल्यातील कलावंतास रसिकांच्या सामोर आणावे अशी इच्छा  असणे स्वाभाविकच आहे.
  या अशा धडपडीच्या भावनेला फेसबुकवर अजिबात अडथळा नाही,आणि म्हणूनच
"जो-तो आपल्या लेखन-क्षमता आणि मर्यादेप्रमाणे - लेखक-कवी  आणि साहित्यिक
म्हणून आपली साहित्यसेवा सदर करीत असतो..

लेखक -सचिन परांजपे यांचे प्रस्तुतचे लेखन हेही "फेसबुकवरील लेखन आहे",
 फेसबुक वरील वाचकांनी आणि मित्रांनी या लेखनास आपली पावती या अगोदरच दिलेली आहे .
हेच लेखन आता सर्व वाचकांच्या भेटीस "माझी फेसबुकगिरी " या लेख-संग्रहाच्या
स्वरूपात आले आहे. हे लेखन वाचल्यावर असेही म्हणता येईल की-
"फेसबुकवर सुद्धा छान ललित लेखन केले जाते."

या लेखनातला "मी " हा या लेखनाचा लेखक असला तरी, या "मी- मध्ये ,
वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब आहे असा भास होतो, याचे कारण असे आहे की,
या संपूर्ण लेखनास "एक सार्वत्रिक भावनेचा स्पर्श आहे", म्हणून यातील लेखन-
-विषय , यातील व्यक्तीरेखा ",  फक्त लेखक सचिन परांजपे यांच्याच न वाटता त्या आपल्याही
परिवारातील परिचित आहेत असे वाटते. हे श्रेय लेखकाचे आहे.

प्रसंग आणि घटना -हे नित्यनियमित घडत असतात , या सर्वांना सामोरे जात असतांना
सामान्य माणूस   "नेमका काय करतो? , कसा व्यक्त होतो  ? ,! याची अनेक उदाहरणे लेखकाने
फार बारकाईने टिपली आहेत. त्यामुळे असेही जाणवते की -
हा लेखक  -माणसाशी एक नाते जोडून आहे ,आणि हे नाते ,जपून ठेवण्याची त्याची  असोशी ",
 या लेखनातील  भावपूर्ण असा धागा आहे.

साडेतीनशे पृष्ठांच्या या पुस्तकात -लेखक सचिन परांजपे यांनी भरभरून
लिहिले आहे .या लेखनात त्यांच्या मनातील खंत-विषाद , आस्था -अनास्था ,
विषमता आणि विसंगती , व्यक्ती आणि त्यांच्तील नमुने , नियती- प्रारब्ध ,
संचित ", जीवन आणि त्यातील सर्व प्रकारचे भले-बुरे अनुभव " अगदी प्रभावी
शैलीतून व्यक्त झालेले आहे.

या संग्रहातील कोणत्याही लेखांचे संदर्भ मी मुदाम टाळले आहेत कारण , हे लेख
आवर्जून वाचावे असेच आहेत . मला आवडलेल्या काही लेखांची शीर्षके देतो..
"बापमाणूस "- (पृ -१५ ), श्रीधराप्पा"- (पृ -२९) , "चैताली "- (पृ -४३ ),
मोहिते "-(पृ- ५५) ,  गणूभटजी "-(पृ- ६३ ), "सोफियासिंग "-( पृ- ७७ ),
"जाहिरात -एक प्रबोधन "-(पृ.१४२ ), "माहितीये मला "- (पृ- १५९ ) ,
मध्यमवर्गीय माणसांचे जग , त्यातील माणसे यांची अतिशय भावपूर्ण दर्शन
रसाळ अशा शब्दातून लेखक -सचिन मधुकर परांजपे यांनी केले आहे.

"माझी फेसबुकगिरी ", या संग्रहाने वाचनीय आनंद नक्कीच दिला आहे.या बद्दल मी
माझे प्रकाशक -मित्र आणि शब्दांजली प्रकाशनाचे -श्री .राज जैन यांना धन्यवाद देतो.
------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे
संपर्क - ९८५०१७७३४२ .
----------------------------------------------------
लेख-संग्रह - "माझी फेसबुकगिरी ..!                                   
-सचिन मधुकर परांजपे .
संपर्क- ९८२३१२४२४२ .
प्रकाशक -
राज जैन -शब्दांजली प्रकाशन -पुणे.
संपर्क - ९८९२७३०९७९
पृ -३५० , किंमत - रु.३६० /-
-------------------------------------------------------------------------------------------------