Friday, June 17, 2016

" रिती ओंजळ :कविता -संग्रहास माझी प्रस्तावना

वाचक-मित्र हो-
फेसबुक व इंटरनेट या माध्यमातून कविता-लेखन करणाऱ्या नाशिकच्या कवयित्री -अनिता बोडके यांचा पहिला कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. त्यांच्या "रिती ओंजळ ",या कविता -संग्रहासाठी प्रस्तावना व ब्लर्ब -मजकूर लिहिण्याचा योग माझ्या वाट्याला आला . या निमित्ताने एका कवीच्या कवितेचा हा परिचय आपल्या अभिप्रायार्थ  सादर करीत आहे.:---
------------------------------------------------------------------------------------------------------------
| श्री ||

प्रास्तविक ....!

 पुस्तकरूपाने लेखक-कवी अधिक ठळकपणे आपल्या समोर येण्यास मोठीच मदत होते  .अशी अक्षर -भेट होणे हा एक छान असा आनंददायक वाचन- योग असतो.
हा माझा "-पहिलाच  कविता संग्रह आहे, आपल्या कविता आवडतील की नाही ?  याचे  स्वागत रसिक-वाचक कसे करतील ?, अशा अनेक प्रश्नांचे ओझेच जणू " कवीच्या मनात असते..आणि  सहाजिकही  आहे 
.
"रिती ओंजळ "या पहिल्या-वहिल्या संग्रहाबद्दल कवयित्री -अनिता बोडके यांच्याही मनात  अशाच भावना नक्कीच असणार..अशा ओझ्यातून मुक्त करण्यास त्यांचीच कविता त्यांना मदत करणार आहे",असे म्हणावेसे वाटते .त्यांच्या  कविता ..नवखेपणाच्या "आवरणातून नक्कीच मुक्त नाहीत ,हे जरी जाणवत असेले तरीही .जसा जसा हा लेखन-प्रवास दमदारपणे पुढे पुढे जात राहील..अनिता बोडके यांच्या कवितेला स्वतःची अशी आपली वाट सापडेल अशी ही आश्वासक रुपाची कविता आहे.,हे कवियित्री -अनिता बोडके यांनी लक्षात असू दावे.

कविता मनाला सोबत करणारी एक सोबती असते ..तिच्याशी मनातल्या भावना बोलून ..कवितेतून व्यक्त करणे "संवेदनशील मनास सहज सोपे वाटते ", याची  प्रचिती अनिता बोडके यंच्या कविता देतात 
आपल्या मनोगतात त्यानी म्हटलेच आहे..
सत्व पहाणर्या कसोट्याच्या क्षणी फक्त आणि फक्त कवितेनेच माझी सोबत केली .म्हणून तिचे धरलेले बोट कधीच सोडणार नाही.

. प्रेम-कविता जास्तीत जास्त असणे" .. कविता संग्रहाचे एक विशेष -स्वरूप असते , रिती ओंजळ -या संग्रहाचे असेच आहे. एकूण साठ- (६०) कविता पैकी बहुसंख्य कविता प्रेम-भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. या कवितेतील साजणा -साजणी -यांच्या भावनेच्या या सर्व कविता आहेत..उत्कट -प्रेम ,समर्पणाची भावना ,प्रेमाची ,-असोशी ,सहवासाची ओढ.,एकमेकांच्या प्रेम बद्दलच्या अपेक्षा ,खंत ,विषाद .असे विविध भावना -या सर्व कवितेतून येतात 
काही कवितेतून -चमकदार ओळी नक्कीच  लक्ष वेधून घेतात ..

उदा-  गंधाळली पहा ही रातीस रातराणी 
        ही चांदणी  नभीची सखया तुझ्याच साठी .. | (सखया तुझ्याच साठी ),
      
         कान्हा तुझ्या प्रेमाची 
          झाली मजला बाधा 
          रंगात  तुझ्या रंगली 
           रंगली वेडी राधा ...(प्रेमवेडी राधा )
           
           कागद लेखणी अन 
            तुझ्या आठवांना घेऊन बसते 
           शब्दाशब्दातून मग कविता माझी हसते (कविता )
" विसरू कशी मी तुला " , साजणा तू " , ," झाले तुझी दिवाणी " , ,माझ्या प्रीतीफुला " ,कृष्णमय मीरा " ",सख्या तुझे प्रेम ," " सख्या रे,"
या अशा शीर्षकाच्या कविता वाचावयास मिळतात . असामान्य ,अलौकिक ,भव्य -दिव्य .असे या प्रेमात घडलेले असे काही नाही. या सध्या -सरळ ,भावूक मनाच्या तरल अशा भावनेच्या कविता आहेत ज्या आपल्या ..मना पर्यंत नक्कीच पोचतात.
रिती ओंजळ " संग्रहात .सामाजिक आशय ,चिंतनशील स्वरूपाच्या ,जीवन-अनुभव टिपणार्या अशा कविता आहेत 
"माय , "परक्याच धनं , कोंडमारा मनाचा "तुळशीची व्यथा " असेही जगू या , कुंपण ", महिला दीन " माझी मुलगी "
कवयित्री च्या मनाने सभोवत्ल्चे वास्तव जीवन जगतांना ही जगणे शब्दातून यतार्थपणे कवितेतून व्यक्त केले आहे.
.    या अशा आशयाच्या काही कविता  उल्लेखनीय अशाच आहेत.
    "सभोवताली काट्यांचा वावर असा की 
         इच्छा असूनही मज उमलता न आले ...|( मी एक कळी )

   "विखुरल्या भावना मझ्या 
          मनाची घुसमट  झाली 
          भरलेली असूनही ओंजळ 
          रितीच राहिली माझी   ..(शीर्षक कविता )

 "       घाव माझे मी जगापासून लपवते हल्ली 
          ठाऊक मला ,मीठ चोळतात माणसं ..( माणसं )

"         मागणे देवा तुझ्याकडे 
           फार काही नाही माझे 
           एक चांगला माणूस बनावा 
            माझा मुलगा ...( माझा मुलगा )

 "          पावलो पावली आहेत 
            वाटेवरती काचा 
           जपून टाक पाऊल सये 
            ही साधीसुधी वाट नाही ...(वाटेवरती काचा गं..)

"रिती ओंजळ " या पहिल्या कविता संग्रहाचे निमित्ताने कवयित्री -अनिता बोडके यांचे अभिनंदन .
कवितेला सखी सोबती मानणाऱ्या या कवियत्री कडून सातात्यांने अधिकाधिक सरस  कविता लेखन अपेक्षित नक्कीच आहे . त्यासाठी रसिक-वाचकांच्या वतीने लेखन -शुभेच्छा.
                                               *****************
अरुण वि देशपांडे -पुणे 
मो-९८५०१७७३४२ 
---------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, June 1, 2016

पुस्तक-परिचय लेख - नवरंग " (चारोळी संग्रह )

पुस्तक-परिचय लेख -
ले- अरुण वि.देशपांडे 
---------------------------------------------
-नवरंग - (चारोळी संग्रह )-संपादित .
-------------------------------------------------------------------------------
फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून "साहित्य -प्रकाशनच्या " कार्याला अलीकडे खूप चालना मिळते आहे असे दिसून येते . अनेक  Whatsapp ग्रुपची यात आनंददायक अशी भर पडल्यामुळे उत्साहाने लेखन करणाऱ्या लेखक आणि कवींना अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आणि व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

अहमदनगर निवासी -श्री अरविंद कुलकर्णी संचलित व्होट्सअप ग्रुप -"साहित्य मंथन "हा ,चांगलाच परिचित असलेला समूह आहे.यातील सभासद समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि  परिचित व्यक्तिमत्व आहेत,  ही सर्व मंडळी  फेसबुक व इंटरनेटवरील माध्य्मातून  लक्ष्यवेधी अशी लेखन-कामगिरी करीत आहेत असे दिसून येते आहे.समुहातील गुणवंत कवींचा  "नवरंग "या शीर्षकाचा चारोळी संग्रह श्री.अरविंद कुलकर्णी यांनी साहित्य मंथन समूहासाठी २५ डिसेंबर २०१५ ला प्रकाशित केलाय.

कविता आणि चारोळी हे दोन्ही काव्य -प्रकार  जसे कवी -प्रिय आहेत तितकेच ते वाचक -प्रिय आहेत ,म्हणून चारोळी लेखन करण्याकडे  कवी-मित्रांचा ओढा  असणे सहाजिकच आहे असे समजावे.असे असले तरी .कविता असो व चारोळी "या दोन्हीतही "आशयाची अभिव्यक्ती " कशी झाली आहे हे महत्वाचे आहेच आहे.ज्याला अभियाक्त होणे जमले .त्याचे लेखन-भान अधिक सजग आहे  असे म्हणू या . एकच विषय ,एकच घटना ,एकच प्रसंग .."डोळ्यांनी पाहणारा ,आणि मनाच्या नजरेने पाहणारा ..एक बोलण्यातून आणि दुसरा शब्दातून व्यक्त होतो .तेव्न्हा  कवींच्या शब्दातले सामर्थ्य "आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही. उत्तम आशयसंपन्न रचनेचे हेच वैशिष्ट्य असते.

"अल्पाक्षरी रमणीयता "हे कवितेचे विशेष असे लक्षणीय वैशिष्ट्य आहे.ते जसे कवितेला लागू आहे..तितकेच ते चारोळीला सुद्धा आहे.त्या दृष्टीने हे सगळे भान सांभाळून असणारी  चारोळी ,एखाद्या संग्रहातून वाचकाला भेटते ,त्यावेळी अर्थातच " वाचनीय असा आनंद मिळतो.
साहित्य -मंथन च्या  "नवरंग " या चारोळी संग्रहात याची प्रचीती नक्कीच येईल.
नवरंग -चारोळी संग्रहात .-महाराष्ट्रातील विविध भागात असलेले ही कवी-मित्र आहेत.- एका अर्थांने "विविधतेच्या मनोरम काव्य-छटा -म्हणजे नवरंग मधील-चारोळी रचना आहेत.
आकड्यातच सांगायचे झाले तर ..२३ कवींच्या -निवडक दोनशे चारोळ्यांचा समावेश या संग्रहात केलेला आहे.

हे रचनाकार या प्रमाणे --१. सुनील राजाराम पवार -सायन -मुंबई., २- डॉ. शरयू शहा- शिवाजी  पार्क -मुंबई ,
३- दिलीप शेषराव धामणे - हिंगोली , ४- अनिल रामचंद्र  हिस्सल- बुलढाणा 
, ५- रामराव सर्जेराव जाधव -शिरापूर-अहमदनगर , ६- डॉ.शिल्पा जोशी - दादर -मुंबई , ७- सौ. प्रिया  वैद्य -ब्रूकलेन-श्रेयसबरी -युएसए. 
८-  सौ. अंजना कर्णिक - माहीम -मुंबई . ९- सौ.जयश्री  पाटील - वसमतनगर -जि.हिंगोली. , 
१०- बालाजी रामचंद्र धोंडगे - पाटील - नांदेड , ११- गजानन विश्वनाथ पाटील -पवार - वरुड-देवी ,जी.हिंगोली ,
१२- सौ.कुंदा  अरविंद  पित्रे - दादर(प) - मुंबई. १३-  नागोराव सा. येवतीकर - येवती -जि.नांदेड .
१४- उत्कर्ष देवणीकर - उमरगा जि.उस्मानाबाद . १५ अरविंद रामचंद्र कुलकर्णी - अहमदनगर ,
 १६-सौ.सुलभा प्रकाश कुलकर्णी - बोरीवली (प)- मुंबई . १७- डॉ.सुप्रभा कुलकर्णी - अहमदनगर , १८- जयंत देशपांडे -        अहमदनगर ,
१९.गजानन  व्ही .वारणकर - तरोडा (खु)-नांदेड . २०- योगेश पुंडलिक देवकर - साखरखेर्डा -जि.बुलढाणा .
२१- सौ.जागृती सुधीर निखारे - कल्याण , २२- उमेश भास्करराव खमितकर - गुंजोटी -जि.उस्मानाबाद.
२३- नंदकुमार  सोवनी - बिबवेवाडी -पुणे .
या संग्रहाची सजावट समूह सभासदांनी केलेली आहे-
मुखपृष्ठ - डॉ.शिल्पा जोशी ,
सजावट - उत्कर्ष देवणीकर 
यांचे या कामगिरी बद्दल अभिनंदन .
वाचक मित्र हो- दोनशे चारोळ्या आहेत.संग्रहातील नेमक्या कोणत्या चारोळ्या उदाहरणासाठी घ्याव्या ? कोणत्या कवींच्या घ्याव्या ?..हा मोठाच प्रश्न माझ्या पुढे होता..या वर एक सोपा आणि साधा उपाय ,तो करावा , साहित्य मंथन  समूह , सहभागी कवी आणि ,प्रकाशक -संपादक -समूह संचालक  श्री.अरविंद कुलकर्णी यांचेशी संपर्क साधून "नवरंग "चारोळी संग्रह घ्यावा.
या संग्रहाने यातील  कवी-मित्रांना लेखनाची  नवी दिशा नक्कीच मिळाली आहे.पुढच्या प्रवासासाठी या सर्वांना तुमच्या वतीने लेखन शुभेच्छा देतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नवरंग"-चारोळी संग्रह .
पृ-५० .देणगी मूल्य -रु. ६०/-
साहित्य मंथन -परिवार 
अहमदनगर .
अरविंद कुलकर्णी -
संपर्क- 9689077239 
---------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------