------------------------------ ------------------------------ -----------------------------
लेख-१३ वा . ले-अरुण वि.देशपांडे .
------------------------------ ------------------------------ ----------
या भागातील लेखक-
१.राधा पंडित , २.संगीता चव्हाण , ३.शोभा दळवी . ४.हरीश दत्तात्रेय कांबळे -साळी
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -------------
नमस्कार मित्र हो ,
संवादिनी कथासंग्रह -परिचय लेख " ,या उपक्रमाने खूप समाधान दिले .
आपल्याच परिवारातील गुणवंत साहित्यिकांच्या बद्दल , त्यांच्या कथा -लेखनाबद्दल
अभिप्रायपर व्यक्त होणे .."हे काम मला स्वतःला -एक पारिवारिक कार्य केल्याचा
आनंद देणारे वाटले आहे.
कारण कुबेर समूह एक मोठा परिवार आहे",या भावनेतून ", या समूहातले कार्य आणि उपक्रम संपन्न होत असतात .
अशा उपक्रमात माझा हा खारीचा लेखन-वाटा आहे", ही भावना मला मोठी सुखद वाटणारी आहे.
मित्र हो -आत्ता पर्यंतच्या बारा- लेखातून - ३६ कथांचा परिचय लिहितांना एक वाचक म्हणून , एक कथा लेखक म्हणून
मला खूप काही शिकायला मिळाले , कथा -या साहित्य प्रकारातील विविधता पाहून मन थक्क झाले . व्यक्ती तितक्या
प्रवृत्ती , आणि व्यक्ती तितक्या प्रकृती " या दोन्हीं उक्तींची प्रचीती मला या कथांच्या वाचनातून घेता आली.
कुबेर समुहाचा पहिला कथा-संग्रह .."आरंभ " असो ,आणि प्रस्तुत दुसरा संग्रह .संवादिनी .हा कथा संग्रह असो ,
दोन्ही संग्रहातील सगळ्याच कथा मला वाचावयास मिळाल्या आहेत याचे
कारण म्हणजे-
आरंभ "संग्रहाच्या संपादन -कार्यात मला सहभागी होता आले , आणि " संवादिनी" संग्रहाचे आस्वादन लेखन करता आले आहे.
हे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की .. कुबेर समूहातील साहित्यिकांच्या लेखनाचा मी एक समग्र वाचक " नक्कीच झालो आहे.
हे सांगण्याचे प्रयोजन असे आहे की .. कुबेर समूहातील साहित्यिकांच्या लेखनाचा मी एक समग्र वाचक " नक्कीच झालो आहे.
मित्र हो-
संवादिनी "संग्रहाचा हा १३ वा लेख आता-"समारोपाचा लेख आहे",
म्हणून हे मनोगत व्यक्त करावेसे वाटले.
आजच्या या लेखात शेवटच्या चार कथांच्याबद्दल लिहितो आहे त्या खालील प्रमाणे -
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
१.कथानुक्रम -३७ - कथा -शीर्षक - चिकूआजी , (पृ- १८० ), ले- राधा पंडित -ठाणे .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------------
माणसातील घट्ट अशा नाते-बंधाचे भावस्पर्शी चित्रण लेखिका-राधा पंडित ..यांनी चिकूआजीच्या व्यक्तिरेखेतून
मोठ्या मनस्पर्शी शब्दातून रेखाटले आहे.
ही कथा चिकुआजीची जीवन-संघर्ष कहाणी सांगते . कथा -फ्रेममध्ये अगदी बंदिस्त म्हणता येईल अशी ही कथा.चीकुआजीच्या भोवतीच फिरते , त्यांच्याबद्दल
जे सांगते ते खूप जिव्हाळ्याने सांगते . जिथे आपलेपणा असतो , तिथेच जीव लावला जातो. कधी हे पारिवारिक- नाते असते , कधी त्याचे स्वरूप मैत्रीतुन आणि सहवासातून जडलेले
भावनिक नाते असते . अशा नात्यांची हे कथा आहे.
लेखिका राधा पंडित यांच्या कथेतून हा भावनिक प्रवाह वाचकांना जाणवतो कुसुम आजीच्या नशिबात लौकिक अर्थाचे सगळे वैभव होते हे सांगतांना
..तिच्या दुर्दैवी नशिबाबद्दल ..कुसुम आजीची ही लाडकी नात ..भावव्याकुळ होऊन आजीची कहाणी सांगते .
काही व्यक्ती ..जन्मास येतात तेच .कम-नशीब घेऊन .मग ..त्यांचे आयुष्य ,दुर्दैवी असे म्हणवले जाते
..कुसुमआजीच्या वाट्याला असेच नशीब आलेले आहे, आणि भोग भोगणे ही तसेच ",
पण, नशीबासमोर हतबल न होणारी .
कुसुमाजी तिच्यातील कणखर वृत्तीच्या बळावर सगळ्या गोष्टीवर मात करीत हसतमुखाने जगत आलेली आहे .
लाडक्या नातीवरचे या आज्जीचे प्रेम ..चिकू या फळासारखे गोड आणि रसाळ आहे..चिकू म्हटले की गोड फळ, आणि त्या उलट "चिक्कू " म्हटले की वृत्ती ,
आणि ही कुसुमाजी " चिक्कू "नाहीये ..
ती मोठ्या मनाने सर्वांना आनंदच वाटत फिरणारी आहे, शापित कुसुमआजीच्या आयुष्याची ही रुपेरी किनार ..
लेखिका राधा पंडित यांनी खूप छान रंगवली आहे.
आपलेपणाच्या भावनेत चिंब भिजलेली कथा आणि यातील कुसुमआजी ,त्यांची लाडकी नात ..
दोघी वाचकांच्या मनात नक्कीच घर करतात.
लेखिका राधा पंडित यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------
२. कथानुक्रम - ३८ - कथा -शीर्षक -निर्णय (पृ .१८३ ) , ले- सौ.संगीता चव्हाण - गोवा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
स्त्रीचे व्यक्तिमत्व एकाच वेळी किती स्वरूपात पहावयास मिळते ,? त्यासाठी लेखिका -संगीता चव्हाण यांची "निर्णय "
ही कथा जरूर वाचली पाहिजे . माणसाच्या मनाच्या दोन अनावर अशा भुका असतात ..एक असते शारीरिक सुखाची ..
या भूकेतच जीवनाची , जगण्याची इतिकर्तव्यता असते " असेच मानणारे आपल्या भवताली आहेत .कारण ."या शारीरिक
सुखापायी ..त्याच्या हव्यासापायी , लालसेपोटी .. स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात वादळे आलेली आहेत ,संकटे उदभवली आहेत ".
पुरुषी-मनात स्वतःसाठीच फक्त
शारीरिक सुख "या भावनेची प्रबलता इतकी आहे की .."मानसिक सुखाच्या भावनेला .कवडीची किंमत द्यायची गरजच
नसते " ' या दृढभावनेतून ..स्त्री मनाची , आणि वैवाहिक जीवनात .पुरुष जोडीदार .आपल्या स्त्री जोडीदाराची कधीच कदर करीत
नाहीत "
अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर ..लेखिका संगीता चव्हाण यांनी कथा लेखन केले आहे. "निर्णय " या कथेतील नायिका "ती "
एकाच वेळी सगळ्या स्त्री रूपाचे प्रतिनिधित्व करते आहे..तिच्या वैवाहिक जीवनाला बारा वर्षे झालीत , पण ती वनवास "भोगत होती .
लग्न होऊनही ..पतीने ..बायको म्हणून तिचा स्वीकार केलेला नाहीये ..किती जीवघेणी शिक्षा भोगावी लागली आहे "तिला ",
आणि तिच्या ..मनाची भावनिक गरज .दुसरी तिसरी नसून ..शारीरिक सुखाची भूक "आहे ..हे सुद्धा समजून न घेणारा नवरा असणारी
दुर्दैवी .पत्नी ..हे तिचे स्त्री रूप ..फारच क्लेशदायी आहे..
"सोडून जा " हे शब्द ऐकून मन बंद करण्यास प्रवृत्त होते .आणि दुसऱ्याच क्षणी तिचा जाण्याचा निर्णय " विरघळून जातो ",
या प्रसंगी "तिच्यातले ..कोणते "स्त्री -रूप " दिसते ? या साठी ही कथा वाचलीच पाहिजे .
मित्र हो .संवादिनी संग्रहातील कथा शब्द संख्येने दिसतात खूप लहान ..पण, त्यातील आशय ..मोठा गहन असतो ",
लेखिका -संगीता चव्हाण ..यांच्या निर्णय" कथेबद्दल असेच म्हणता येईल.
त्यांना लेखन शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------
३. कथानुक्रम - ३९ .शीर्षक - ज्ञानोत्सव (पृ.१८५ ) - ले- सौ.शोभा दळवी - मुंबई
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
बाल-कुमार मित्रांसाठी असावी अशी ही छान -सुंदर- प्रेरक कथा आहे.. नीता नावाच्या गुणवंत मुलीची गोष्ट लेखिका शोभा दळवी
अगदी सहज शैलीत सांगितली आहे.
नीताला ..तिच्या शेजारच्या दहावीत शिकणाऱ्या अजिंक्य दादा मुळे "अभ्यास कसा केला पाहिजे ,
अभ्यास आणि पूर्वतयारी " हे किती महत्वाचे आहेत .हे देखील नीताला या दादामुळेच कळते
एका अर्थाने नीताला ..योग्य संगतीचा लाभ झाला , आणि खुल्या मनाने तिच्या मनाने या गोष्टीचा स्वीकार केला , विद्यार्थ्याचे
कर्तव्य " "ज्ञानोत्सव " ही कथा सांगते .
नीताच्या आचरणातून ..त्याचे फळ तिला काय मिळते ..त्याची ही सुंदर अशी बोध-कथा आहे.
लेखिका - शोभा दळवी यांनी या संस्कारक्षम कथेचे बाल-कुमार मित्रांसाठी अभिवाचन करावे , हे संस्कार -कार्य "त्यांच्या हातून होवो ,
यासाठी शुभेच्छा .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------------
कथानुक्रम -४० . कथा -शीर्षक - अबोल - एक प्रेम कथा (पृ-१८८ )- ले- हरीश कांबळे - दापोली
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
संग्रहातील बहुसंख्य कथा कमी शब्द- संख्येच्या त्याची सवय झालेली असतांना ..
ले- हरीश कांबळे लिखित ..अबोल..एक प्रेमकथा "
ही शेवटची कथा इतर कथांच्या तुलनेने ..दीर्घ अशी ..एक भावूक ..प्रेम कहाणी ..आहे.
... यातील नायक "तो ज्याचा असाच उल्लेख पूर्ण कथानकात लेखकाने
"तो " असाच
केला आहे .
"तो " म्हणजे राधेवरच्या एकतर्फी प्रेमात दिवाना झालेला , प्रेम-रोगाने पछाडलेला ..प्रेमवीर आहे.. त्यामुळे ..त्याचीप्रदीर्घ व्यथा
म्हणजेच ही कथा ,आपण वाचीत जातो ..
एकतर्फी -प्रेमाची .ही शोकांतिका आहे हे कथा -रहस्य (?) माहिती झाल्यामुळे
सहनशील वाचक-मित्र ही भूमिका स्वीकारून ही कथा वाचावी लागते .
"नायिका ..राधा " .तिचे वर्णन .. लेखकाने .प्रेमकथेत शोभावे असे अगदी यथोचित शब्दात केली आहे.
.त्यात पुन्हा , हा कथानायक "तो " ..राधाच्या "
प्रेमात (एकतर्फी ) इतका बुडून गेलेला आहे की
. एकतीस वर्ष नंतर ,त्याच्या प्रेमाची ओढ तीच आहे ..फक्त ..आता त्यात थोडी अपराधाची जाणीव आहे ..
ती म्हणजे .त्याच्यात उणीवाच उणीवा असून ही ..राधेवर प्रेम करण्याचा अपराध "तो -च्या "हातून घडला आहे.अशी त्याची भावना होत जाते ,
या अपराधाबद्दल राधेने त्याला माफ करावे " बस इतकेच .
कारण जीवनप्रवसात "तो " मध्ये खूप बदल होतात , त्यामुळे या जीवनाच्या प्रवासात तो पुढे खूप प्रगल्भ 'वगरेझालेला आहे असे लेखकच आपल्याला सांगतो..
आणि अचानक ..राधा आणि त्याची समोरासमोर भेट होणार ..तो क्षण ..
एकतीस वर्ष नंतर लाभला आहे ..या एकतर्फी ..प्रेमाचे काय होते ?,
राधा ..त्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद कसा देते ..ही उत्सुकता
वाचक म्हणून आपल्याला असतेच ..त्यासाठी ,,हे कथा जरूर वाचावी.
लेखक हरीश कांबळे यांची ही लेखन शैली ..कथालेखना इतकीच -कादंबरी लेखनास अनुकूल आहे "असे सुचवावे वाटते.
लेखकाची ही कथा - जुन्या काळातील एखाद्या लोकप्रिय चित्रपटाची आठवण करून देईल ..अशी ..फिल्मी- स्टोरी नक्कीच झाली आहे.
प्रदीर्घ लेखन करण्याची क्षमता हरीश कांबळे या लेखकात आहे हे जाणवते ..त्यामुळे ..भविष्यात ..या लेखकाकडून एखादी बहारदार प्रेम -कादंबरी यावी अशी शुभेच्छा करू या .
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - समारोप - लेख -
लेख- १३ वा
ले-अरुण वि.देशपांडे .पुणे.
९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ----------