Tuesday, May 12, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय- लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय- लेख - १० वा . ले- अरुण वि.देशपांडे
लेखक - १.सुहास कुलकर्णी , २.वृंदा कुलकर्णी , ३. राजश्री भावार्थी
--------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार वाचक-मित्र हो ,
कुबेरसमूह प्रकाशित  -हा दुसरा संग्रह - संवादिनी , 
यातील  चाळीस (४०) कथांचा परिचय करून  देणाऱ्या
लेखमालेचा आजचा हा दहावा भाग सादर  करतांना ,असे वाटते आहे - की -

कथा -कादंबरी म्हणजे आपल्या जीवनाचे अनेक रंग दाखवणारे साहित्य असते .लेखक आपले
जीवनानुभव , जीवन विषय दृष्टीकोन , आणि त्यातून आपले स्वताचे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत 
असतो . 
कथा हा लेखन प्रकार या वैशिष्ट्यामुळे वाचकप्रिय आहे. संवादिनी " मधील कथा देखील  अशाच आहेत.
या कथा लेखना वाचकांशी संवाद साधणाऱ्या आहेत " असेच वाचकांना वाटते .
संग्रहाचे  संवादिनी "शीर्षक त्यामुळे समर्पक वाटणारे आहे . 

या लेखात - खालील 3 कथांचा परिचय करून घेऊ या-  
------------------------------------------------------------------------------------------
१.कथा - निकाल -(पृ.१४० ), ले- सुहास कुलकर्णी - मुंबई 
------------------------------------------------------------------------------------------------------------
एस.टी.महामंडळातील कर्मचारी "अण्णा ", त्यांच्या सौभाग्यवती निर्मला -ज्या गृहिणी आहेत, या जोडप्याची 
एकुलती एक कन्या रेवती यांची ही कथा आहे.

 सुरक्षित जीवनशैलीच्या चौकटीत राहणाऱ्या  कुटुंबाला  ज्यावेळेस आजच्या विपरीत असुरक्षित
 अशा वातावरणाच्या वाढत चालेल्या प्रभावाचा फटका बसतो 
"आणि मोठेच संकट "समोर  उभे राहते .मग 
अण्णा आणि त्यांचे कुटुंब या संकटाचा सामना कसा करतात त्याची ही थ्रिलर कथा आहे.

वाईट-प्रवृत्तीच्या माणसाना  कुणाचा कसा छुपा वरदहस्त असतो " ही  लपून न राहणारी गोष्ट 
असते " पण ,म्हणतात न , सामन्य माणसाचा कुणी वाली नसतो ..याची जाणीव होते , मग, अशा संकटातून 
बाहेर कसे पडायचे " ?

त्यासाठी जीवावर उदार होतात माणसे " आणि स्वताच्या कुटुंबाची सुटका करून घेतात .आणि प्रश्नाचा "निकाल " लागतो .
पण, त्यासाठी त्यांनी निवडलेला  मार्ग ..योग्य की की अयोग्य ? 

लेखक सुहास कुलकर्णी  यांनी हाच विषय  वेधकशैलीत मांडतांना -  पोलीस ,पोलीस कारवाई ,
असामाजिक घातक घटक , त्यांच्याकडून महिलांना होणारा त्रास हे नेमकेपणाने मांडले आहे ,त्यामुळे हे लहानशी कथा 
खूप लक्षवेधक झाली आहे.
लेखक सुहास कुलकर्णी यांना लेखन-शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. कथा - पाहुणा  (पृ. १४४ ), ले- वृंदा पठाडे -कुलकर्णी - बोईसर 
-------------------------------------------------------------------------------------------
आपल्या संस्कृतीत ..अतिथी "हा देवोभव आहे . आलेला "पाहुणा " त्याचा उत्तम पाहुणचार " करायचा असतो "

या गोष्टी आपल्या विचार - आचार यांचा भाग आहेत . प्रत्येकजण आपल्या ऐपती प्रमाणे योग्य तो पाहुणचार "करीत असतो .
आपल्याकडे येणाऱ्या "पाहुण्यांचे  अनेक प्रकार आहेत ,त्या त्या प्रमाणे "पाहुणचार केले जातात आणि त्याची  बडदास्त ठेवली जाते .

प्रस्तुत संग्रहातील 
पाहुणा " या कथेत जो पाहुणा आहे ..तो कोण ? यासाठी ही कथा आवर्जून वाचायला हवी . कथेच्या शेवटी लेखिका - वृंदा 
पठाडे -कुलकर्णी या पाहुण्या बद्दल आपल्याला सांगतात. त्यामुळे इथे या पाहुण्याबद्दल तुम्हाला काहीच न सांगता उत्कंठा कायम ठेवणे योग्य ठरेल.

कथा व्यक्तीच्या मनातील पाहुण्या विषयी असलेल्या भावनिक आपलेपणाची आहे. हक्काच्या आणि जवळच्या आपल्या माणसा ला 
आपण मनातले खूप काही ..मनापासून सांगत असतो.
अण्णा " ही व्यक्तिरेखा  खूप छान रेखाटली गेली आहे. त्यांच्या व्यक्त होण्यातून वाचकांना -एक रसिक, बहुश्रुत ,आणि कुटुंब वत्सल 
गृहस्थ भेटल्याची अनुभूती येईल .
 अशी पारिवारिक कथा ..भावनावश करणारी आहे.
लेखिका वृंदा पठाडे -कुलकर्णी यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.कथा -मनोमिलन - (पृ.१४८ )  ले- राजश्री  भावार्थी - पुणे.
------------------------------------------------------------------------------
आपले कौटुंबिक जीवनमान  नाती आणि त्यातील संबंध यावरच चालते .कोण, कुणाला , कशा शब्दात , कोणत्या  उद्देशाने बोलतो  ?
त्या बोलण्यातुन मग "घडले -बिघडले "चा  खेळ चालू होतो. 

या सगळ्यात  गोंधळ न करता आपला  भावनिक  तोल सांभाळणे जमत असते  " अशी माणसे ,"  खरी समजूतदार माणसे " असतात असे म्हणू या. 
मनोमिलन ही कथा  अशाच समजूतदार माणसांची आहे.
लेखिका -राजश्री भावार्थी "यांनी लिहिलेली ही कथा आहे.

रोजच्या दैनंदिन प्रसंगात आपणकौटुंबिक जीवनात वावरतांना इतरांशी  कसे वागत असतो .आणि प्रत्येक प्रसंग त्यात आपले काय ?
 असे - स्व-केंद्रित होऊन वावरत असतो. हे सगळे काही कथेतून अतिशय सध्या .सरळ आणि भावनिक शब्दातून लेखिकेने मांडले आहे.
शरयू " ही व्यक्तिरेखा ..प्रातिनिधिक आहे, आजूबाजूच्या घरात शरयुचे हे असणे , दिसणे  सहज संभव आहे.

समजूतदारपणा , समंजसपणा  हे  गुण आपल्यातील "माणूसपणा " मोठाच करीत असतात.. हे शरयूला तिच्या मैत्रिणीनी 
योग्यवेळी खूप छान समजावून दिले आहे. शरयू ला हे पटलेले आहे हे जास्त सुखद आहे .
लेखिका राजश्री भावार्थी यांनी हे अतिशय सुरेख लिहिले आहे.

कथेचे ओघवतेपण .मन प्रसन्न करणारे आहे.
लेखिका - राजश्री भावार्थी यांच्या लेखनास शुभेच्छा .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#संवादिनी परिचय लेख - 
लेख- १० वा . 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment