Wednesday, May 27, 2020

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ -वा. ले-अरुण वि.देशपांडे

#संवादिनीकथासंग्रहपरिचय - लेख -१२ - वा. ले-अरुण वि.देशपांडे .
लेखिका -  १. ऋतुजा उमेश कुलकर्णी , २..डॉ.जयश्री बारई- गिरडकर , ३. अंजली मराठे 
--------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार मित्र हो -
संवादिनी कथा संग्रहातील कथांचे वाचन करतांना एक वाचक म्हणून मला या कथांनी खूप 
वाचन -आनंद दिला . यातील कथा लेखकांनी   आपल्या लेखन -गुणांचा परिचय कथेतून करून देत
कथा वाचनीय व्हावी " याचे लेखकीय भान ठेवले आहे ",हे सांगावेसे वाटते.
या वैशिष्ट्यामुळे संवादिनी कथा-संग्रहातील कथा वाचकांच्या स्मरणात दीर्घकाळ असतील "


आजच्या लेखात ज्या कथांबद्दल सांगणार आहे त्या कथा खालील प्रमाणे -
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१. कथानुक्रम -३३ -, शिर्षक- योगायोग  (पृ.१६६ ), ले- ऋतुजा उमेश कुलकर्णी - रत्नागिरी 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वामनराव आणि त्यांची पत्नी यांच्या सहजीवनाची  ही कथा .. 
 हळव्या भावकवितेने कथेचा आरंभ होतो  .
आणि कवितेच्या आशयातून कथेत काय असेल ? याचा अंदाज वाचकांच्या मनात सुरु होतो , ही प्रेम-कथा 
आहे असे म्हणता येईल ,पण ती तरुणाईची नसून ..परिपक्व -समंजस अशा एका जोडप्याच्या सह-प्रवासाची आहे.

या सह-जीवनाच्या प्रवासात ..जोडीदाराचे अचानक मध्येच साथ सोडून निघून जाणे " हे संकट , वियोग , वामनरावांच्या 
वाट्याला येणे . ही घटना चुटपूट लावणारी , मन व्याकूळ करणारी आहे. तसेच या कथेतील "योगायोग " असाच 
चटका लावणारा आहे..

वामनरावांच्या संजीवानीचा हट्ट, तिचा संकल्प , तिची अट " त्याची पूर्तता कोणत्या योगायोगाने पूर्ण होते "
हे सगळे कथा वाचून जाणून घेण्याची गोष्ट आहे.

लेखिका ऋतुजा उमेश कुलकर्णी .यांची ही कथा आजकालच्या  "अलक -अति लघुकथा " श्रेणीतली नसेल ही ,
पण,  "योगायोग " या कथेला लघुत्तम कथा " असे सर्वार्थाने म्हणता येईल .
 " मोजक्याच  शब्दात -नेमकेपणाने लेखन "हे त्यांचे वैशिष्ट्य या कथेतून नक्कीच जाणवते 

लेखिका- ऋतुजा उमेश कुलकर्णी या  कथा -कविता -ललित लेखन सातत्याने करणाऱ्या साहित्यकारा आहेत, 
वाचकांना त्यांचे लेखन परिचित आहे.त्यांना लेखन-शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२. कथानुक्रम - ३५ - शिर्षक - वळवाच्या पावसाची सर .. (पृ.१७३ ),ले-  डॉ. जयश्री बारई- गिरडकर - नागपूर 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवितेची ,किंवा एखाद्या भावगीताची  ओळ वाटावी असे हे काव्यमय कथा शिर्षक ..लक्ष वेधून घेणारे आहे.,
प्राध्यापक असलेल्या श्रीकांतची असफल प्रेमाची कथा -एक शोकांतिका आहे असे वाटू लागते , पण 
कथानकातील  अनपेक्षित वळणाने कथेचा आशय बदलतो आणि ती एक वेगळ्या प्रेमाची कथा होऊन जाते ,
प्रेमाच्या या नात्यास ..उदात्त भावनिक नात्यातील प्रेम " असे आपण म्हणू या.

श्रीकांत आणि प्राजक्ता .. कोवळ्या मनाची ,अबोध आणि स्वप्नाळू मने  असणारी  युवा -जोडी .
त्यांची भेट , सहवासाचे क्षण , श्रीकांतच्या मनात प्राजक्ता विषयीच्या निर्माण झालेल्या भावना " हा सगळा 
भाग तरुण वयातील प्रेम भावनेचा रम्य-भावूक असा अविष्कार " लेखिका डॉ.जयश्री बारई यांनी सुंदर शब्दात 
मांडला आहे 
नंतरच्या एका प्रसंगाने .श्रीकांत आणि प्राजक्ताच्या आयुष्याला कलाटणी मिळते ..हा प्रसंग , ती घटना 
कोणती ,?श्रीकांत स्वतःला क्षमा करू शकत नाही , असे काय झाले असावे ?
याची उत्तरे ही छान कथा वाचूनच मिळतील .

श्रीकांत -प्राजक्ता आणि स्पृहा ..तीनही व्यक्तिरेखा कथेचे आकर्षण -बिंदू आहेत. ललित-लेखनास अनुकूल असलेली 
रम्य -वर्णनप्रचुर लेखन शैली लेखिकेस लाभलेली आहे . 
श्रीकांतची ही कथा .खरोखरच ,,वळवाच्या पावसाची सर "
आहे, ज्यात आपण कोरडे राहूच शकत नाहीत , भिजणार हे नक्की .

डॉ. जयश्री बारई- गिरडकर यांच्या लेखन-प्रवासास शुभेच्छा .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.कथानुक्रम -३६ - शिर्षक - आदर्श  (पृ. १७७  ), ले- अंजली आशुतोष मराठे - गुजरात 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या आयुष्याला , आपल्या जगण्याला अर्थपूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभणे हा खरोखर एक मोठा भाग्य-योग 
असतो . संपन्न व्यक्तिमत्व आणि जीवनाचे सार्थक झाले "  असे .. वाटणाऱ्या कर्मयोगी व्यक्ती सगळ्यासाठी 
प्रेरक -आदर्श -उदाहरणे असतात . 

आदर्श " या कथेतून .नेहा आपल्या सुधा आज्जीच्या आदर्श जीवनाचे मर्म जाणून घेते . समारंभ नंतर या दोघींचे 
जे बोलणे चालू असते .ते संवाद विलक्षण मन-स्पर्शी आहेत.

लेखिका अंजली मराठे यांनी या कथेत ..आजी-आणि तिची नात  या नात्याचे सुंदर असे भावनिक पदर उलगडून दाखवतांना
सुधाआजीच्या आगळ्या-वेगळ्या आयुष्याची गोष्ट सांगितली आहे.

देशभक्ती ,देशप्रेम , देशाभिमान , देशासाठी त्याग "या प्रखर भावना सुधाआज्जीच्या कुटुंबातच होत्या , त्याचे सुरेख 
वर्णन नेहा आणि सुधा आज्जीच्या संवादातून आपल्याला होते .
 सैनिकाचे कुटुंब आणि त्या घराची धीरोदात सुधाआज्जी ...
हे सगळेच विलक्षन रसायन असलेली व्यक्तिमत्व आहेत हे आपल्याला जाणवते आणि मन भारावून जाते.
ताठ मानेने सलाम करणाऱ्या सुधाआज्जी समोर आपण आपोआप नतमस्तक  होऊन जातो..  सैनिक कुटुंबाची ही कथा वेगळेपणामुळे लक्षात रहाते.

कुमार -वयोगटातील बालमित्रांसाठी ही एक उत्तम अशी "आदर्श "कथा नक्कीच आहे.. हे वेगळेपण मला जाणवले .

लेखिका अंजली मराठे यांनी या कथेचे अभिवचन बाल-मित्रांसाठी जरूर करावे , खूप छान होईल हे.
इथे ही कथा ..मोठ्यांच्या कथा -संग्रहात आलेली  असली तरी ..कथेचे "आदर्श -रुप  " सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे  आहे.

लेखिका अंजली मराठे यांना लेखन -शुभेच्छा .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------.
#संवादिनीकथासंग्रहपरिचय - 
लेख -१२ -वा.
 ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२ 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment