Wednesday, December 13, 2017

पुस्तक-परिचय लेख - छान छान कवितांची मस्त ट्रीप - " चंद्रावरची सहल "

पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि,देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
---------------------------------------------

छान छान कवितांची मस्त ट्रीप -
" चंद्रावरची सहल "
-----------------------------------------------------------
अंबड -जिल्हा -जालना येथील श्री.नारायण  खरात यांच्या बालकविता लेखनाने 
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखनात एक नव्या उमेदीचे व्यक्तिमत्व दाखल झाले आहे 
ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. 
बाल -कुमार मित्रांसाठी "चंद्रावरची सहल "हा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. 

बालसाहित्य लेखन करीत असतांना साहित्यिकाला अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते . 
आपला  वाचक आणि त्याचे आकलन "याबद्दल जाणीव ठेवून कवी- नारायण खरात यांनी 
प्रस्तुत संग्रहातील कविता लेखन केले आहे  हे विशेष कौतुकाचे आहे असे म्हणावे लागेल. 
चंद्रावरची सहल "या संग्रहात एकूण ३० कविता आहेत. .यातील कवितांची शीर्षके  नेहमीपेक्षा 
वेगळी वाटणारी आहेत . उदा .." निसर्गदूत कावळा ", सूर्याला विनंती ", "वीज ताई ",
"सूर्य झाकायचे ठरले ", "समुद्राची हाक " , "शिडीवरून ढग उतरले खाली ", "राजाला अद्दल घडली ",
"आकाशाची गोधडी ",  "कपटी बगळा ", .ई ... .!
या गोष्टी सदृश्य  शीर्षकामुळे  बालमनात  नक्कीच उत्सुकता  वाढेल आणि ते अगोदर या कविता नक्की 
वाचतील . 

"मनोरंजन आणि प्रबोधन "हे दोन हेतू साध्य करण्याची जबाबदारी बालसाहित्याची लेखन करणाऱ्या 
साहित्यिकांकडून नेहमीच केली जाते ", कवी-नारायण खरात यांनी प्रस्तुतच्या  कविता -लेखनातून 
या अपेक्षांची पूर्ती कण्याचा चांगला प्रयत्न केला आहे असे  जाणवते . 

आपल्या समोर आलेल्या कविते मधून रोजचेच विषय वाचायला  मिळतात 
त्या विषयांचे काव्यरूप बालमानावरती संस्कार करणारे असते . कवी नेमकेपणाने 
 ओळखीच्या गोष्टींची पुन्हा नव्याने ओळख करून देत असतो ते शब्द-आणि ती कविता 
वाचकमनाला भावणारी असते.  असे वास्तव आणि कविकल्पना याचा सुंदरसा मेळ "म्हणजे 
नारायण खरात यांच्या "चंद्रावरची सहल" संग्रहातील बालकविता आहेत. 

या कविता मोठ्या अर्थपूर्ण आणि सामाजिक संदेश देणार्या आहेत" कविता पूर्ण 
वाचून झाल्यावरच शीर्षकाची योजना लक्षात येईल. जसे.. 

"कावळा नाही बावळा 
 कावळा मोठा हुशार 
माणसाला ही केवढा 
 करायला लावतो विचार ..(निसर्गदूत कावळा  पृ.-३ )

जीवनदायिनी अशी नदी ..तिची ही कविता -
"माझी नदी गेली कुठे 
तिच्याविना जीव तुटे 
तिचं जीवन हिरावून घेतलं 
तिच्यावर नव्हे आपल्यावर बेतलं ..  ( नदी  ५),

झाडे लावा -झाडे जगवा .हा संदेश देणारी कविता-
झाडं नका तोडू झाड नका तोडू 
झाडालाही येतं माणसासारखं रडू ..(झाडं नका तोडू.. पृ-२८),

आणि -ही एक गंमतशीर कविता -
आभाळच आलं  खाली "(पृ-३१ )

रस्त्याने फिरू लागली 
चांदोमामासोबत मुले 
बागेमधल्या कळ्यांची 
होऊ लागली फुले .. 

याशिवाय .."सर , "अप्पल  पोटया ", पाखरांची शाळा ", पाऊस ", चंद्रावरची सहल ",
स्वप्न " , उन्हाळ्याची सुट्टी "अशा इतर कविता ज्या बाळ-मित्रांना खूप आवडण्यासारख्या  आहेत
प्रा.डॉ. पृथ्वीराज  तौर-सर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -नांदेड " यांनी कवी -
नारायण खरात यांच्या  कविता -लेखनाची यथायोग्य भलावण केली आहे.
चित्रकार -मित्र - प्रमोद दिवेकर यांच्या अनुरुप अशा रेखाचीत्रांनी या कवितेला छान सजवले आहे ,
त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे.
प्रकाशक  श्री. -दत्ता डांगे आणि त्यांचे इसाप प्रकाशन "बालसाहित्याचे मोठा आधारस्तंभ आहे ,
त्यांनी "चंद्रावरची सहल" हा संग्रह आकर्षक स्वरूपात सिद्ध केला आहे 
बाल-कविता लेखनात कवी-नारायण खरात  यांच्या कवितांची लक्षणीय अशी भर पडली आहे.
यापुढे ही त्यांची कविता नित्यनेमाने बाल-मित्रांच्या भेटीस यावी अशी अपेक्षा करू या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय लेख-
-अरुण वि,देशपांडे -पुणे.
संपर्क - ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवी- नारायण खरात 
अंबड जि. जालना . 
संपर्क -९४२१३ २४३४० 
---------------------------------------------
चंद्रावरची सहल "
(बालकविता संग्रह )
पृ- ३२ , मूल्य- ४० रु.
प्रकाशक - श्री.दत्ता डांगे ,
इसाप प्रकाशन , नांदेड.
संपर्क - ९८९००९९५४१ 
-----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment