Wednesday, December 13, 2017

पुस्तक- परिचय लेख- लेख-संग्रह - पण का ?

पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे 
------------------------------------------------

लेख-संग्रह -
पण का ?
-सौ.वृषाली कुलकर्णी 
-------------------------------------------------
वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेले लेखन वाचकांच्या पसंतीस प्राप्त होते ,त्यातूनच लेखकास हेच लेखन पुस्तकरूपाने यावे अशी इच्छा होणे अगदी सहाजिकच आहे ..आणि याचा दुसरा फायदा असा होतो की ..पुस्तक रूपाने हे साहित्य अधिकाधिक वाचकांच्या पर्यंत जाते 
वर्तमानपत्रातून एखादे सदर
 चालवतांना लेखन करणाऱ्या साहित्यिकावर मर्यादित शब्दात लेखन करण्याचे बंधन असते " आणि हे बंधन पाळून केलेले लेखन आणि ते सादर  वाचकप्रिय होणे ..हे त्या लेखकाचे आणि लेखनाचे मोठेच यश असते . अशा यशाच्या मानकरी होणार्या लेखिका आहेत सौ. वृषाली कुलकर्णी .
पुण्यनगरी "या दैनिकाच्या "प्रवाह "पुरवणीतून  ..लेखिकेचे हे लेखन "माझा दृष्टीक्षेप " या शीर्षकाने प्रसिद्ध झाले ,या लेखांना वाचकांचा प्रतिसाद कधी फोनवरून ,तर कधी वाचकांनी लिहिलेल्या पत्रून मिळत गेला ..हा अनुभव एकूणच लेखनाला अधिक आत्मिक असा बल देणारा ठरला ..हे नक्कीच खूप छान झाले ..आणि वृषाली कुलकर्णी  यांचे हे लेख आता पुस्तकरूपाने  "पण का ? या शीर्षकाने प्रकाशित झाले आहे ,त्या निमित्ताने लेखिकेचे  अभिनंदन करू या.


पण का ? या लेख संग्रहात  एकूण २४ लेख आहेत , या सर्व लेखांचे "माझ्या मते एक समान भाव-सूत्र आहे - ते म्हणजे ..स्त्री-मनातील अनेक भावनिक दुखांना मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधीच दिली आहे .कारण "आपले कुणी तरी मनापसून ऐकतो आहे ,हा स्पर्श मनाचा कोंडमारा दूर करणारा ठरला आहे.,
या हृदयीचे -त्या हृदयी " ज्या सहजतेने आले आहे "  त्याचे श्रेय लेखिकेच्या ..एक सहृदय माणूसपण "असण्यात आहे .
"लेखिकेने अतिशय आपलेपणाने या स्त्रियांना बोलते केले आहे आणि त्यांच्या भावनिक,मानसिक दुखांना ऐउक्न घेतले ", हे असे केल्यावर या अनेक स्तीर्यंना किती हलके -किती मोकळे मोकळे वाटले असेल ? याची कल्पना हे लेखन वाचल्यानंतर येईल "..
माणसाचे मन किती विलक्षण असते ..मनाच्या ठायी असलेल्या अनेक  अवगुणांचे अस्वथ करणारे प्रत्याकारी दर्शन या संग्रहातील एकेक आत्मिक कहाणीतून येते आणि , हे वेदनादायक आणि असह्य जगणे " लेखिका आपल्याला ज्या शब्दातून घडवते ते अतिशय परिणामकारक असेच आहे. एक नक्की  की " पर -दुखः हे कितीही शितल "असू दे ..,या लेखातील नायिकांनी जे भोगलाय त्याबद्दलच्या त्यांच्या मनातील  धगधगत्या भावना वाचकांच्या मनाला दाहकता जाणवून देणाऱ्या आहेत..
व्यक्ती-तितक्या -प्रवृत्ती " या म्हणी सारखेच एक वाक्य या लेखनास वाचल्यावर माझ्या मनात सहज आले की -
"व्यक्ती एक असो वा अनेक ..त्याच्यात अनेक विकृत्ती असू शकतात ".

यातील २४ लेखातील विविध स्त्री-व्यक्ती रेखा ..या आपल्या भवताली असणार्या समाजातीलच आहेत , यातील अनेकांचे जगणे  हे निम्न -आर्थिक स्तरातील आहे ..यातील जगण्यात अनेक कमतरता असतात ,त्यामुळे त्यांच्या वाट्याला अनेक पदरी दुखः ,आणि वेदना आलेलेया आहेत ..ज्यामुळे त्यांचे जीवन जास्तच त्रासदायक आणि नकोसे वाटणारे असेच आहे "हे आपल्याला जाणवत राहते..

हसरे दुख: मधील उमा ", संशयाचं भूत - मधील रेखा ",  "एकटी -मधील रोहिणी ,कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे "..या लेखातील - "शांता ", गोष्ट घटस्फोटाची -प्रतिभा , अज्ञानाचा अंधार -मधील रंजना ",
यांच्या वाट्याला आलेले भोग .विलक्षण असेच आहेत ..यातून सुटका नाही " हे जाणवल्यावर त्यांची असहायता ,अगतिकता ,हतबलता  आपल्या मनाला व्यथित करणारी आहे 
ज्याचं जळतं -त्यालाच कळतं " हे जितका भावनिक सत्य आहे -तितकेच हे व्यावहारिक कटू सत्य आहे " , या कहाण्यातील नायिकांच्या वाट्यास जे आले आहे ते इतरांच्या वाट्याला येऊ नये " त्या साठी तरी हे लेखन जनमानसात जायला हवे आहे.

लेखिका वृषाली कुलकर्णी यांचे हे लेखन तसे म्हटले तर एका मोठ्या उदात्त हेतूने केले आहे असे म्हणावेसे वाटते ,हे लेखन ज्या वेळी पुण्यनगरीतून "प्रकाशित होत होते .त्यावेळेस अनेक वाचकांनी आपल्याला सकरात्मक दृष्टीकोन लाभला हे आवर्जून कळवले " हे अगदी यथायोग्य आहे"  

साहित्यकार उमेश मोहिते यांनी या संग्रहास  यथोचित अशी प्रस्तावना दिली आहे .त्यांच्या विवेचनातील हा मुद्दा मला विशेष  महत्वाचा वाटतो..
"थोडक्यात - वृषाली कुलकर्णी यांनी संवेदनशील वृत्तीनं या सर्व शोषित व पिडीत स्तीर्यांना बोलकं केलं आहे आणि त्यांच्या दु:खच्या ,होरपळीच्या मुळांशी  जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यांच्या परवडीचे व अपेष्टांचे मूळ शोधून बघितले आहे, त्यवर मार्मिक भाष्यही केले आहे आणि त्यांनी स्त्री सहजसुलभवृत्तीन लीलया  हे साधलंही आहे.
चित्रकार -योगेश प्रभुदेसाई यांनी केले  " मुखपृष्ठ" लेखसंग्रहाच्या आशयास अधिक ठळक करते .याचा आवर्जून उल्लेख करतो आहे.
रावा प्रकाशन "कोल्हापूर ,यांनी हा  संग्रह प्रकाशित केला आहे.

लेखिका सौ.वृषाली कुलकर्णी यांच्या "पण का ? ", या लेख-संग्रहाचे साहित्य-क्षेत्रात खूप छान स्वागत होईल "हे नक्की . त्यांच्या लेखन-प्रवासास अनेक शुभेच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
संपर्क -   ९८५०१७७३४२ 
------------------------------------------------------------
पण का ?
लेख-संग्रह -
पृ. १००  , मूल्य- रु.१५०/-
सौ.वृषाली कुलकर्णी 
संपर्क -   ७७९८११४५२५ 
-----------------------------------------------------------------
प्रकाशक - राहुल प्रताप कुलकर्णी 
रावा प्रकाशन -कोल्हापूर 
संपर्क -    ९४२२०४४४६१ 
----------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment