Saturday, January 18, 2014

पुस्तक- परिचय*- माझ्या गझला - बदिउज़्ज़मा बिराजदार .

श्री ||                                               अरुण.वि.देशपांडे -पुणे.
पुस्तक परिचय "-                         
गझल -यात्रेतील एक दिलचस्प मकाम -
"माझ्या गझला "
-------------------------------------------------
मराठी गझल आणि कविता लेखनातील एक परिचित नाव
बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी",सोलापूरचे.
मराठी  गझल हिंदी मार्फत दाखल न होता सरळ उर्दूच्या
वाटेने मराठीत आली पण उर्दुचा प्रभाव न घेता मराठमोळ्या
रूपातच घडत गेली .या गझलच्या प्रवासात मुस्लीम मराठी साहित्यिकांचे
योगदान लक्षणीय आहे आणि यात कवी-शायर बदिउज्ज्मा बिराजदार
यांचे ही महत्वाचे योगदान आहे.
माझ्या गझला "हा त्यांच्या नवा संग्रह आहे. साठ गझलांचा समावेश
असलेल्या त्यांच्या संग्रहाचा हा परिचय.
आपल्या मनोगतात कवी म्हणतो आहे  की-
छंदोबद्ध रचनेच्या छंदात राहण्याचा छंद आहे म्हणूनच
माझ्या हातून "माझ्या गझलांची "निर्मिती झाली आहे."
समजातील माणसांच्या व्यथा ,आधुनिक माणसांच्या यथार्थ
संघर्ष ,सुख,आणि दुखः यांची कहाणी हा या संग्रह्तील गझलांचा
भावार्थ आहे.
गझल हा ताकदीचा काव्यप्रकार आहे असे म्हटले जाते.
आणि शायर बदिउज्ज्मा बिराजदार -साबिर शोलापुरी
यांच्या गझला या काव्य्प्रकारचा "बेहतरीन अविष्कार आहे.
वर वर पाहता हे "शेर " सभोवतालच्या वृत्ती,प्रवृत्ती, यावर
भाष्य करणारे वाटतील .पण अंतरंग उलगडले जाते आणि मग
त्यातील "पारलौकिक तत्व" आपल्या मनावर प्रभाव टाकते.
सभोवतालची विपरीत परिस्तिथी जगण्यातला आनंद
घालवून टाकणारी आहे .जीवनाच्या मांगल्याची चाड
नसलेल्या लोकांसोबतचे क्षण मनाला अधिकच वेदना देणारे
वाटतात. अशा वेळी कवी म्हणतो-
भामट्यान च्या  मैफलीला आज मी टाकून आलो
संगती ती दाम्भिकांची सर्व मी सोडून आलो ..(मैफलीला --पृ-२२)
दहशतीच्या वातावरणात जगण्याची भयावह सक्ती ज्यावेळी
होते त्यावेळी संवेदनशील मनाला होणाऱ्या वेदना ....
   -हुंदके दाबून येथे राहतो, पण दहशतीने
सावली पाहून आता चालतो,पण दहशतीने ....(हुंदके दाबून--पृ.२३)
    लागला ना अंत केव्न्हां माणसांचा
    वागणे ही  मज तयांचे ज्ञात नाही ---
कवी आपल्या प्रेरणेने या परिस्तिथी चा शोध गेतांना दिसतो -
का बेचीराग झाली पणतीत ज्योत ही
अंधारले कशाने मतितार्थ शोधतो.......(स्वार्थीच फार झाले..पृ-४३)
व्यथा ,खंत,खेद,विषाद, उपेक्षा -अशा भावनांचे गडद रंग या रचनेतून
दिसत असले तरी कवीची सामाजिक बांधिलकी  जाणवते.आणि
सभोवतालचा माणूस आणि कवी यांच्यातील आपले पानाचे नाते दिसते.
कवी बदिऊज्मा बिराजदार-साबिर- यांनी मोठ्या उत्कटतेने
या भावना आपल्या रचनेतून व्यक्त केल्या आहेत.माणूस आणि
त्याच्या व्यथा हा कवीचा काव्य-विषय आहे-त्यामुळेच तो म्हणतो- 
      डोळे भरून येती साबिर अशा व्यथेने
      हे शल्य आसवाना पण गाळता न आले.....(जे जे मनात..पृ-३०)
माझ्या गझला " या संग्रहात सामाजिक जीवन मनावरती  भाष्य
करणाऱ्या रचना अधिक प्रभावी आहेत. डा.राम पंडित यांनी कवी
बदिउज्ज्मा बिराजदार यांच्या गझलेची पाठराखण केली आहे.
गझला आणि कविता रसिकांसाठी "माझ्या गझला " हा संग्रह जरूर
वाचावा असाच आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
-परिचय- अरुण.वि .देशपांडे-पुणे.
माझ्या गझला (काव्य संग्रह)
बदिउज्ज्मा बिराजदार-साबिर शोलापुरी"- मो-९८९०१७१७०३.
प्रकाशक- सुविद्या प्रकाशन
३७४-उत्तर कसबा--सोलापूर-४१३००७.
पृ-६२           कि-रु.६०/-
***************************************************************************************

No comments:

Post a Comment