पुस्तक -परिचय :
अरुण.वि.देशपांडे-पुणे.-
-------------------------------------
भावनिक कल्लोळाच्या कथा "-"मनातल्या वावटळी "-
----------------------------------------------------------------
पुस्तक रूपाने येणारे लेखन लेखक-कवीचे वाण्ग्मयीन व्यक्तिमत्व साकारणारे असते. याचा परिणाम वाचकांच्या
मनावरती दीर्घकाळ रेंगाळणारा असतो. त्यातच लेखक-कवीच्या "पहिल्या पुस्तकाची बात कांही औरच असते.असा
अनुभव लेखिका-प्रगती कोलगे त्यांच्या "मनातल्या वावटळी " या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने घेतच असतील.
"ग्रंथाली "या मान्यवर संस्थेने प्रगती कोलगे यांचा कथा-संग्रह नुकताच -जुलाई -२०११ ला प्रकाशित केला आहे.
त्याचा हा स्वागतपर परिचय सानंद करून देतो आहे.
या संग्रहात एकूण ९ कथा आहेत.कथांमधील व्यक्तीरेखा वाचकांशी निवेदनातून संवाद साधतांना -आपापल्या जीवनतील
भावनिक घटना,प्रसंग ,व्यक्ती-संदर्भ आठवणी सांगतात.या निवेदनात्मक कथेतून एक समान भावनिक धागा आहे
असे जाणवते .हा धागा आहे तो "मनात कल्पिलेले असे कांही आणि वाट्यास आलेली जीवनतील वास्तव " यातील
तफावतीने उध्वस्त: मनाने आयुष्याला सामोरे जाताना -मनाची झालेली अवस्था ,भोगावे लागणारे ताण-तणाव ,विचार,आणि
भावना यांच्याशी करावी लागणारी यातानाकारक तडजोडी -आणि यामुळे सामाजिक व्यवहार -आणि भावनिक व्यवहार यातील
संघर्ष कराव्या लागणाऱ्या व्यक्तींची भावनिक ससेहोलपट -असे अनेकविध कंगोरे टिपणे आणि त्यावर भाष्य करणे -हे
लेखिका-प्रगती कोलगे यांचा पहिला लेखन-प्रयत्न जमून आलेला आहे.असे म्हणावेसे वाटते.
'कृष्णा( कान्हा देवकीचा की यशोदेचा),रागिणी (जनम पत्रिका आणि लग्न),माया (लादलेला संसार),वर्षा-(ओढ हक्काच्या -
संपूर्ण प्रेमाची),सुहास -(अज्ञात वास्तव).या काही कथांचे उल्लेख करावेसे वाटतात.
माणसांची नाजूक स्वप्ने,त्यांच्या कोमल भावना ,सहजीवनाची रंगबिरंगी चित्र, या सर्वांची झालेली निराशाजनक होरपळ
मनातली वावटळी "मधील कथांचे विशेष आहे.
कृष्णाचे दुखः: ,माधवीची कथा,वर्षाची व्यथा ,माणिकराव यांची अपेक्षा ,नितीनच्या अधुऱ्या प्रेमाची विफलता ,हे या कथा लेखनाचे
विषय आहेत.केवळ नशीब-आणि नियती यामुळे भोगावे लागणारे दुख:,त्यामुळे हे माणसे अगतिक,हतबल,आणि नैराश्यग्रस्त होऊन
जगण्याला सामोरी जात आहेत असे चित्र उभे राहते.त्यामुळे नकारात्मक भावनाचे सावट दाटून आले आहे ,असे वाचकांना जाणवेल.
लेखिका प्रगती कोलगे यांनी अतिशय समरसून लेखन केले आहे.आपल्या भोवती असलेल्या माणसांविषयी असलेलेल्या आस्था
त्य्नाच्या कथेतून दिसून येते.कथानकातील व्यक्तिरेखांना लेखिकेचे पाठबळ लाभल्यामुळे की काय ,या कथांमधून भावनिक-
आणि वैचारिक अशा दोन्ही भावनांचे चमकदार शब्दरूप पहावयास मिळते.
लेखिका प्रगती कोलगे यांचे या लेखन उपक्रम बद्दल अभिनंदन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय-अरुण.वि.देशपांडे.-पुणे.९८५०१७७४२.
"मनातल्या वावटळी "-कथा संग्रह -लेखिका-प्रगती कोलगे
प्रकाशक :ग्रंथाली-मुद्रण सुविधा केंद्र
संपर्क :०२२-२४४७४८४३,
अरुण.वि.देशपांडे-पुणे.-
-------------------------------------
भावनिक कल्लोळाच्या कथा "-"मनातल्या वावटळी "-
----------------------------------------------------------------
पुस्तक रूपाने येणारे लेखन लेखक-कवीचे वाण्ग्मयीन व्यक्तिमत्व साकारणारे असते. याचा परिणाम वाचकांच्या
मनावरती दीर्घकाळ रेंगाळणारा असतो. त्यातच लेखक-कवीच्या "पहिल्या पुस्तकाची बात कांही औरच असते.असा
अनुभव लेखिका-प्रगती कोलगे त्यांच्या "मनातल्या वावटळी " या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने घेतच असतील.
"ग्रंथाली "या मान्यवर संस्थेने प्रगती कोलगे यांचा कथा-संग्रह नुकताच -जुलाई -२०११ ला प्रकाशित केला आहे.
त्याचा हा स्वागतपर परिचय सानंद करून देतो आहे.
या संग्रहात एकूण ९ कथा आहेत.कथांमधील व्यक्तीरेखा वाचकांशी निवेदनातून संवाद साधतांना -आपापल्या जीवनतील
भावनिक घटना,प्रसंग ,व्यक्ती-संदर्भ आठवणी सांगतात.या निवेदनात्मक कथेतून एक समान भावनिक धागा आहे
असे जाणवते .हा धागा आहे तो "मनात कल्पिलेले असे कांही आणि वाट्यास आलेली जीवनतील वास्तव " यातील
तफावतीने उध्वस्त: मनाने आयुष्याला सामोरे जाताना -मनाची झालेली अवस्था ,भोगावे लागणारे ताण-तणाव ,विचार,आणि
भावना यांच्याशी करावी लागणारी यातानाकारक तडजोडी -आणि यामुळे सामाजिक व्यवहार -आणि भावनिक व्यवहार यातील
संघर्ष कराव्या लागणाऱ्या व्यक्तींची भावनिक ससेहोलपट -असे अनेकविध कंगोरे टिपणे आणि त्यावर भाष्य करणे -हे
लेखिका-प्रगती कोलगे यांचा पहिला लेखन-प्रयत्न जमून आलेला आहे.असे म्हणावेसे वाटते.
'कृष्णा( कान्हा देवकीचा की यशोदेचा),रागिणी (जनम पत्रिका आणि लग्न),माया (लादलेला संसार),वर्षा-(ओढ हक्काच्या -
संपूर्ण प्रेमाची),सुहास -(अज्ञात वास्तव).या काही कथांचे उल्लेख करावेसे वाटतात.
माणसांची नाजूक स्वप्ने,त्यांच्या कोमल भावना ,सहजीवनाची रंगबिरंगी चित्र, या सर्वांची झालेली निराशाजनक होरपळ
मनातली वावटळी "मधील कथांचे विशेष आहे.
कृष्णाचे दुखः: ,माधवीची कथा,वर्षाची व्यथा ,माणिकराव यांची अपेक्षा ,नितीनच्या अधुऱ्या प्रेमाची विफलता ,हे या कथा लेखनाचे
विषय आहेत.केवळ नशीब-आणि नियती यामुळे भोगावे लागणारे दुख:,त्यामुळे हे माणसे अगतिक,हतबल,आणि नैराश्यग्रस्त होऊन
जगण्याला सामोरी जात आहेत असे चित्र उभे राहते.त्यामुळे नकारात्मक भावनाचे सावट दाटून आले आहे ,असे वाचकांना जाणवेल.
लेखिका प्रगती कोलगे यांनी अतिशय समरसून लेखन केले आहे.आपल्या भोवती असलेल्या माणसांविषयी असलेलेल्या आस्था
त्य्नाच्या कथेतून दिसून येते.कथानकातील व्यक्तिरेखांना लेखिकेचे पाठबळ लाभल्यामुळे की काय ,या कथांमधून भावनिक-
आणि वैचारिक अशा दोन्ही भावनांचे चमकदार शब्दरूप पहावयास मिळते.
लेखिका प्रगती कोलगे यांचे या लेखन उपक्रम बद्दल अभिनंदन.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय-अरुण.वि.देशपांडे.-पुणे.९८५०१७७४२.
"मनातल्या वावटळी "-कथा संग्रह -लेखिका-प्रगती कोलगे
प्रकाशक :ग्रंथाली-मुद्रण सुविधा केंद्र
संपर्क :०२२-२४४७४८४३,
No comments:
Post a Comment