||श्री || -अरुण वि .देशपांडे -पुणे
__पुस्तक - परिचय __
"कविता -संग्रह- "भरलेलं आभाळ
कवियित्री - वर्षा चौगुले
------------------------------------------------------
पहिली कविता , पहिला पाउस - दोन्ही गोष्टी मनाला चिंब चिंब करून टाकणाऱ्या
अशाच असतात. आणि या दोन्ही आवडत्या भावनाना जर "कवितासंग्रहात "
पाहण्याचा योग आला तर? -अहो हा योग आलाच आहे.
वर्षा चौगुले -या परिचित कवियित्रीचा "पहिला कविता संग्रह- "भरलेलं आभाळ "
आपल्या भेटीस आला आहे, त्याचे स्वागत करू या .
या भरलेल्या आभाळात" ढग दाटून आले आहेत ते " प्रेम -भावनेचे "., सखा , त्याची
ओढ, प्रेम व्यक्त करतांनाची आतुरता , आणि समर्पण " अशा विविध भावनांच्या
ढगांची दाटी" या आभाळात झाली आहे.
एकूण ऐंशी (८० ) कवितांचा या संग्रहात समावेश केलेला आहे.आणि
हा प्रेम-कवितांचा संग्रह असल्यामुळे, इतर विषयांच्या कविता का नाहीत ?
हा प्रश्नच उद्भवत नाहीये ,हे फार छान झाले आहे. आपल्या मनोगतात
कवियित्री म्हणते आहे-
भरलेलं आभाळ म्हटले की आठवत तो त्या आभाळाने साठवून ठेवलेला पाऊस ,
त्याने त्या पावसाला रिकाम कराव म्हणून आपल्या जीवाची होणारी घालमेल
आणि त्यानंतरच मग त्याच भिजवण आणि आपल मनोसक्त भिजण ...!
कविमनाच्या प्रत्येकाला भोवतालीचां निसर्ग सारखा साद घालीत असतो.
आणि आभाळ, त्या आभाळाची क्षणागणिक बदलणारी मनमोहक रूपे ,
दिनमान आणि ऋतुमान " यांचे बदलणे -हे सारे मग कवितेतून येते .
वर्षा चौगुले या कवियत्रीला हे सारे जाणवते , आणि मग तिच्या कवितेतून
आभाळ येत, पाऊस आणि त्याचे मनाला भारावून टाकणारे दर्शन येते ,
या सोबत मनातील प्रीती -भावना ,साथ सोबत करणारा प्रिय सखा , त्याच्या
बद्दलचा अनावर भावना -एवढे सगळे कवितेतून सहजतेने येते.
संग्रहातील कविता आकाराने लहान आणि मोठ्या आहेत . त्यातील छोट्या
कविता अधिक अर्थपूर्ण झाल्या आहेत"
असे मला वाटले.आणि या कवयित्रीला फेसबुकवर कविता /काव्य रचना
प्रकाशित करण्याची सवय असल्यामुळे कदाचित, छोट्या-छोट्या रचनांतून
अधिक प्रभावीपणे सांगणे छान जमलेले आहे. त्याचीच प्रचीती या संग्रहातील
अनेकाक्नेक कवितेतून नक्कीच येईल.
काही छान -कवितांचे उदाहरण घेऊ या- म्हणजे हे "भरलेलं आभाळ" कस
इंद्रधनुष्यी रंगाने खुलून आलेले आहे " हे ही कळेल.
"भर दुपारी
वळवाच्या पावसाने
चेहेऱ्यावर शिंपडावे
तृप्तीचे थेंब..
तशी तुझी भेट ............( पृ..८५)
२. भरलेलं आभाळ , थोडासा पाऊस
मन कस विसरेल बरसायचं ?
थोडस तुझ , खूप काही माझ
गाव कस विसरेल तरसायाच ?........( सांग-....पृ.६६)
३. "भेटीला कारण तर सख्या ,
मीच देऊन जाते
आठवणीच्या पावसात माझ्या
भिजवून जाते............(कारण...पृ .२४)
४. स्वप्नात येतांनासुद्धा सख्या ,
मला भीती फार वाटते ...
माझ्या डोळ्यातल्या पावसाने
तुझी झोप मोडेन म्हणून.....( भीती ...पृ..३८)
दोन मनाच्या तारा जुळतात ,त्यानंतरच्या सहवासाचे सुरेल सूर झंकारून येतात,
प्रेमाचा साक्षात्कार होण्याच्या " दिव्य क्षणाची अनुभूती मनाला होते , आणि मग
भोवतालीचे जगच बदलते," हे मनोरम्य बदलणे , प्रेमाचे बहरून येणे, मनांचे फुलुनी येणे,
परस्पर ओढीने भेटणे,"प्रेमाची हे विभ्रम कवयित्रीने -वर्षा चौगुले यांनी अतिशय तरलतेने
कवितेतून व्यक्त केले आहेत.
'भरलेलं आभाळ, तू , आताशा , लाट , तुला गंधाळतांना ,
अंगण, मेहंदी , खास , प्राजक्त, सागरा , कवडसा , घाई, सांग,
तरीही , याद, अस रे कस ? , पापणी पापणी....आणि इतर...
या संग्रह्तील कवितेतून प्रेम- आणि प्रेमभावना , प्रेमातील
,आसक्ती, प्रेमाची भक्ती , मनाची समर्पण भावना ,
स्वप्न आणि वास्तव, मिलनाची आस, आणि विरह या विरुध्द
भावना -असे खुपसे पैलू कवितेतून आपल्याला पहायला मिळतात.
वर्षा चौगुले यांच्या पहिल्याच कविता संग्रहाचा हा परिचय आहे,
समीक्षण नाही. त्यामुळे काय भावले हेच सांगितले आहे, याचा अर्थ
असाही नाही की -यातील सर्वच कविता खूप छान वगेरे आहेत," काही
सुचवावे असे जरूर आहे, त्यासाठी कवयित्री -वर्षा चौगुले परिश्रम
घेतील,कारण त्या अभ्यासू लेखिका आणि कवयित्री आहेत.
" त्यांच्या कवितांचा पुढील प्रवास अधिक आश्वासक आहे " याच्या खाणाखुणा
"भरलेलं आभाळ" या कविता संग्रहातून दिसून येतातच. आणि प्रसिद्ध साहित्यकार
नीलम माणगावे यांच्या प्रस्तावनेने या कवितेला पाठबळ लाभलेले आहेच.
कवितेच्या प्रांतात संग्रहाच्या रूपाने वर्षा चौगुले यांचे हे आगमन
रसिकांना आवडणारे असेच आहे. "भरलेलं आभाळ" या कविता -
संग्रहाचे ते आस्थापूर्वक स्वागत करणार याची खात्री आहे.
प्राची प्रकाशन -पुणे याने हा संग्रह प्रकाशित केला आहे.
कवयित्री-वर्षा चौगुले यांचा संपर्क-
०२३३/२३३०६८८ .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकपरिचय- -अरुण वि .देशपांडे -पुणे.मो- ९८५०१७७३४२.
"कविता संग्रह- भरलेलं आभाळ "
वर्षा चौगुले ,
प्रकाशक- प्राची प्रकाशन -पुणे
पृ. ९० मूल्य- रु- १००/-
__पुस्तक - परिचय __
"कविता -संग्रह- "भरलेलं आभाळ
कवियित्री - वर्षा चौगुले
------------------------------------------------------
पहिली कविता , पहिला पाउस - दोन्ही गोष्टी मनाला चिंब चिंब करून टाकणाऱ्या
अशाच असतात. आणि या दोन्ही आवडत्या भावनाना जर "कवितासंग्रहात "
पाहण्याचा योग आला तर? -अहो हा योग आलाच आहे.
वर्षा चौगुले -या परिचित कवियित्रीचा "पहिला कविता संग्रह- "भरलेलं आभाळ "
आपल्या भेटीस आला आहे, त्याचे स्वागत करू या .
या भरलेल्या आभाळात" ढग दाटून आले आहेत ते " प्रेम -भावनेचे "., सखा , त्याची
ओढ, प्रेम व्यक्त करतांनाची आतुरता , आणि समर्पण " अशा विविध भावनांच्या
ढगांची दाटी" या आभाळात झाली आहे.
एकूण ऐंशी (८० ) कवितांचा या संग्रहात समावेश केलेला आहे.आणि
हा प्रेम-कवितांचा संग्रह असल्यामुळे, इतर विषयांच्या कविता का नाहीत ?
हा प्रश्नच उद्भवत नाहीये ,हे फार छान झाले आहे. आपल्या मनोगतात
कवियित्री म्हणते आहे-
भरलेलं आभाळ म्हटले की आठवत तो त्या आभाळाने साठवून ठेवलेला पाऊस ,
त्याने त्या पावसाला रिकाम कराव म्हणून आपल्या जीवाची होणारी घालमेल
आणि त्यानंतरच मग त्याच भिजवण आणि आपल मनोसक्त भिजण ...!
कविमनाच्या प्रत्येकाला भोवतालीचां निसर्ग सारखा साद घालीत असतो.
आणि आभाळ, त्या आभाळाची क्षणागणिक बदलणारी मनमोहक रूपे ,
दिनमान आणि ऋतुमान " यांचे बदलणे -हे सारे मग कवितेतून येते .
वर्षा चौगुले या कवियत्रीला हे सारे जाणवते , आणि मग तिच्या कवितेतून
आभाळ येत, पाऊस आणि त्याचे मनाला भारावून टाकणारे दर्शन येते ,
या सोबत मनातील प्रीती -भावना ,साथ सोबत करणारा प्रिय सखा , त्याच्या
बद्दलचा अनावर भावना -एवढे सगळे कवितेतून सहजतेने येते.
संग्रहातील कविता आकाराने लहान आणि मोठ्या आहेत . त्यातील छोट्या
कविता अधिक अर्थपूर्ण झाल्या आहेत"
असे मला वाटले.आणि या कवयित्रीला फेसबुकवर कविता /काव्य रचना
प्रकाशित करण्याची सवय असल्यामुळे कदाचित, छोट्या-छोट्या रचनांतून
अधिक प्रभावीपणे सांगणे छान जमलेले आहे. त्याचीच प्रचीती या संग्रहातील
अनेकाक्नेक कवितेतून नक्कीच येईल.
काही छान -कवितांचे उदाहरण घेऊ या- म्हणजे हे "भरलेलं आभाळ" कस
इंद्रधनुष्यी रंगाने खुलून आलेले आहे " हे ही कळेल.
"भर दुपारी
वळवाच्या पावसाने
चेहेऱ्यावर शिंपडावे
तृप्तीचे थेंब..
तशी तुझी भेट ............( पृ..८५)
२. भरलेलं आभाळ , थोडासा पाऊस
मन कस विसरेल बरसायचं ?
थोडस तुझ , खूप काही माझ
गाव कस विसरेल तरसायाच ?........( सांग-....पृ.६६)
३. "भेटीला कारण तर सख्या ,
मीच देऊन जाते
आठवणीच्या पावसात माझ्या
भिजवून जाते............(कारण...पृ .२४)
४. स्वप्नात येतांनासुद्धा सख्या ,
मला भीती फार वाटते ...
माझ्या डोळ्यातल्या पावसाने
तुझी झोप मोडेन म्हणून.....( भीती ...पृ..३८)
दोन मनाच्या तारा जुळतात ,त्यानंतरच्या सहवासाचे सुरेल सूर झंकारून येतात,
प्रेमाचा साक्षात्कार होण्याच्या " दिव्य क्षणाची अनुभूती मनाला होते , आणि मग
भोवतालीचे जगच बदलते," हे मनोरम्य बदलणे , प्रेमाचे बहरून येणे, मनांचे फुलुनी येणे,
परस्पर ओढीने भेटणे,"प्रेमाची हे विभ्रम कवयित्रीने -वर्षा चौगुले यांनी अतिशय तरलतेने
कवितेतून व्यक्त केले आहेत.
'भरलेलं आभाळ, तू , आताशा , लाट , तुला गंधाळतांना ,
अंगण, मेहंदी , खास , प्राजक्त, सागरा , कवडसा , घाई, सांग,
तरीही , याद, अस रे कस ? , पापणी पापणी....आणि इतर...
या संग्रह्तील कवितेतून प्रेम- आणि प्रेमभावना , प्रेमातील
,आसक्ती, प्रेमाची भक्ती , मनाची समर्पण भावना ,
स्वप्न आणि वास्तव, मिलनाची आस, आणि विरह या विरुध्द
भावना -असे खुपसे पैलू कवितेतून आपल्याला पहायला मिळतात.
वर्षा चौगुले यांच्या पहिल्याच कविता संग्रहाचा हा परिचय आहे,
समीक्षण नाही. त्यामुळे काय भावले हेच सांगितले आहे, याचा अर्थ
असाही नाही की -यातील सर्वच कविता खूप छान वगेरे आहेत," काही
सुचवावे असे जरूर आहे, त्यासाठी कवयित्री -वर्षा चौगुले परिश्रम
घेतील,कारण त्या अभ्यासू लेखिका आणि कवयित्री आहेत.
" त्यांच्या कवितांचा पुढील प्रवास अधिक आश्वासक आहे " याच्या खाणाखुणा
"भरलेलं आभाळ" या कविता संग्रहातून दिसून येतातच. आणि प्रसिद्ध साहित्यकार
नीलम माणगावे यांच्या प्रस्तावनेने या कवितेला पाठबळ लाभलेले आहेच.
कवितेच्या प्रांतात संग्रहाच्या रूपाने वर्षा चौगुले यांचे हे आगमन
रसिकांना आवडणारे असेच आहे. "भरलेलं आभाळ" या कविता -
संग्रहाचे ते आस्थापूर्वक स्वागत करणार याची खात्री आहे.
प्राची प्रकाशन -पुणे याने हा संग्रह प्रकाशित केला आहे.
कवयित्री-वर्षा चौगुले यांचा संपर्क-
०२३३/२३३०६८८ .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तकपरिचय- -अरुण वि .देशपांडे -पुणे.मो- ९८५०१७७३४२.
"कविता संग्रह- भरलेलं आभाळ "
वर्षा चौगुले ,
प्रकाशक- प्राची प्रकाशन -पुणे
पृ. ९० मूल्य- रु- १००/-
Arun Deshpande-- far sudar parichay karun dilat.. Kavita nakkich vachen. Dhanyawad.Jai Maharashtra..jai Marathi..
ReplyDelete