Thursday, December 1, 2016

पुस्तक-परिचय - "हास्यगाथा "

पुस्तक परिचय - "
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------
हास्यगाथा "- बहारदार विनोदी लेखन .
---------------------------------------------------------------------------
विनोदी -- लेखनाची उत्तम भट्टी जमली आहे  ",याची दणकेबाज प्रचीती आपल्या हास्यरसायन "या पुस्तकातून देणारे लेखक म्हणून शीलवंत वाढवे प्रसिद्ध आहेतच ,
.तसे पाहीलेतर  - .हास्यरसायन "या त्यांच्या" पहिल्याच कथा संग्रहाला -राज्य शासनाचा -  २००९-१० चा "दत्तू बांदेकर -हा विनोदी लेखनासाठीचा राज्य पुरस्कार" -प्राप्त झाला आहे.

अशा या लेखकाचे विनोदी लेखनाचे दुसरे पुस्तक "हास्यगाथा " नुकतेच प्रकाशित झाले आहे 
सहाजिकच प्रस्तुतच्या लेखनातून हमखास विनोदी शैलीतले लेखनवाचण्यास  मिळणार",  या अपेक्षेने वाचक हे पुस्तक हातात घेणार ..मग, .त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणारे असे हे बहारदार विनोदी लेखन आहे" हे अगोदरच सांगावेसे वाटते.

"हास्यगाथा "- या विनोदी कथा संग्रहाच्या निमित्ताने वाचकांचे दोन फायदे झाले आहेत ते असे..
१.छान ,हलक्या-फुलक्या आणि मिस्कील विनोदी कथा वाचावयास मिळणार  हे तर आहेच , त्या सोबत ,भारदस्त असा -शब्द-बोनस मिळालाय .
२.डॉ. श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना  आणि जेष्ठ लेखक श्री.बाबाराव मुसळे यांचा अभिप्राय ,या स्वरूपात .
या दोन गोष्टी मुळे एक महत्वाचा फायदा असा झालाय  की..हास्यागाथा "मधील विनोदी लेखनाकडे बघण्याचा एक वेगळा  दृष्टीकोन वाचकास लाभतो आणि या लेखनास अधिक न्याय मिळतो "हे खूप महत्वाचे आहे असे सांगावेसे वाटते.असो.

प्रस्तुतच्या संग्रहात एकूण १२ कथा आहेत .यातील कथा आहेत "असे वाटणारे जसे काही लेख आहेत .तसेच काही लेख -कथा असल्याचा भास नक्कीच होईल.विनोद निर्मिती "हेच या लेखनाचे प्रयोजन आहे ..मग त्यासाठी जे रसायन लागते ..तो सगळा कच्चा माल " आणि त्यासाठी जमवावी लागणारी भट्टी " ही कुशलता लेखकास चांगलीच अवगत झालेली आहे. अशा प्रकारच्या लेखनास आवश्यक असलेली लवचिक शब्द्शैली ..लेखकास लाभलेली आहेच . .त्याचा पुरेपूर असा सफाईदार वापर या लेखनात केलेला आहे .
वर्तमानातील वास्तव ..आणि त्यातले त्याचे संदर्भ यांचा विनोद निर्मितीसाठी वापर करून घेता येणे "हे तसे सोपे काम नाही .कारण त्यातील अर्थ-निर्मिती विनोदास पूरक ठरवण्यासाठी  त्यातील विसंगती अचूकपणाने  टिपता येणे " हे नेमकेपणाने साधता आले तरच त्यातून  अपेक्षित विनोद निर्माण होईल अन्यथा हास्य-निर्मितीचा प्रयत्नच "हास्यास्पद "ठरण्याचा मोठा धोका लेखकाच्या समोर असतो .आपल्या लेखनाचे असे काही होणार नाहीये"  याचे अवधान जपणे  "या हास्यागाथा " चे लेखक शीलवंत वाढवे यांना छान जमले आहे .

ग्रामीण -जीवनाचा अनुभव घेत जगणारा हा लेखक आपल्या लेखनातून "नागरी जीवनमानाचे चित्रण करतांना .त्याच शब्दांचा वापर .विनोद निर्मितीसाठी करतो .त्यामुळे या लेखनातून एकाचवेळी ग्रामीण व नागरी अशा दोन्ही जीवनाचे जे चित्रण घडते .ते लेखकाच्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे दर्शन आहे. तसे पाहिले तर .आपल्या दैनंदिन व्यवहारात   जेजे शब्द सर्रास आणि सहजतेने बोलले जातात त्याचाच वापर या लेखनात आहे..यातील व्यक्तिरेखा तीच भाषा बोलतात जी नेहमी आपल्या कानावर पडते . म्हणजेच असेही म्हणता येईल की ..बोलण्याच्या भाषेतून .शब्दातून लेखकाने विनोद निर्मिती केली आहे .
प्रसंगनिष्ठ विनोद , व्यक्तीनिष्ठ विनोद हे तर या लेखनाचे वैशिष्ट्य आहेच त्यापेक्षा या लेखकाची निवेदनशैली जास्त प्रभावी आहे ..याचे कारण हे  लेखक एक कलाकार आहेत , सादरीकरण कसे करायचे असते याची त्यांना उत्तम जाण आहे ..त्यामुळे त्यांच्या कथा ते वाचकासमोर जणू सादर करतात "असे वाटावे अशी सांगण्याची त्यांची पद्धत आहे.खुलवूनसांगणे,  ते अधिक रंजक -स्वरूपात सादर करणे .याचा मोठाच लाभ या संगर्हातील लेखनास झाला आहे.

या लेखनात उपहास आहे ,उपरोध आहे ..बोचरा उपदेश आहे ..चांगले तेच अधिक चांगले कसे आहे ",हे पटवून देण्यासाठी "वाईट गोष्टीला ठळक दाखवून " जनमानसात त्याचा कसा प्रभाव असतो" हे अनेक कथातून लेखक सांगतो.सामजिक कार्य ,सार्वजनिक जीवनातील घटना  या बरोबरच एक व्यक्ती म्हणून या सर्वांचा त्यातील वर्तन-सहभाग ..याचे खुमासदार शब्दरूप म्हणजे हे कथा -लेखन असे म्हणता येईल.
यातील कथानायक .स्वतहाचे स्वतंत्र असे जीवनविषय तत्वज्ञान अनेकवेळा सांगतो ..त्यातून इष्ट-अनिष्ट  याचीच नेमकी चर्चा उपरोधिक मनोगतातून व्यक्त केली जाते ."आत्मा-परीक्षण "असेही करता येते " याचा शोध रंजक आहे.

प्रस्तावनेत या संग्रहातील कथांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेलाच आहे",त्यावर इथे अधिक भर ती काय घालावी.
काही  कथांची शीर्षके -वानगीदाखल सांगतो-
१.निवडणूक (पृ.३१), २.तंटामुक्ती -(पृ-५७ ) ३- पासबुक, फेसबुक  आणि स्मार्ट माणूस -(पृ.१११ )
लेखक ग्रामीण भागातील प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विषयावरील कथांमधून त्यांच्यातील लेखकास अधिक प्रभावीपणाने लेखन करता आलेले आहे हे जाणवते ..त्या कथा -अर्थातच उत्तम झाल्या आहेत.
१.पटपडताळणी - (पृ.१ ), आणि २.शाळा (पृ.३७)..यांचा उल्लेख करावा लागेल.
एकूणच हे लेखन विनोदी आहे हे तर खरेच ..त्याच बरोबर एका  चिंतनशील  व्यक्तीमत्वाने आजच्या विपरीत वर्तमानावर केलेले भाष्य आहे जे विचार करण्यास भाग पाडते.
अंतर्मुख करण्याचे विलाक्ष्ण असे सामर्थ्य विनोदी लेखनात असते" याची प्रचीती "हास्यागाथा " मधून नक्कीच येते.
लेखक शीलवंत वाढवे यांना आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२ 
-------------------------------------------------------------------------------------------------------------
हास्यगाथा 
(विनोदी कथा संग्रह )
शीलवंत वाढवे 
मो-७३५०८४८१२२ 
पृ.१२४ ,मूल्य- रु.१४०/-
प्रकाशक -
आत्मभान प्रकाशन -औरंगाबाद ,
मो-९४२२८६३६६५ 
-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment