पुस्तक-परिचय लेख -
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ ---------------
-नवरंग - (चारोळी संग्रह )-संपादित .
------------------------------ ------------------------------ -------------------
फेसबुक आणि इंटरनेटच्या माध्यमातून "साहित्य -प्रकाशनच्या " कार्याला अलीकडे खूप चालना मिळते आहे असे दिसून येते . अनेक Whatsapp ग्रुपची यात आनंददायक अशी भर पडल्यामुळे उत्साहाने लेखन करणाऱ्या लेखक आणि कवींना अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माध्यम आणि व्यासपीठ उपलब्ध झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
अहमदनगर निवासी -श्री अरविंद कुलकर्णी संचलित व्होट्सअप ग्रुप -"साहित्य मंथन "हा ,चांगलाच परिचित असलेला समूह आहे.यातील सभासद समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत आणि परिचित व्यक्तिमत्व आहेत, ही सर्व मंडळी फेसबुक व इंटरनेटवरील माध्य्मातून लक्ष्यवेधी अशी लेखन-कामगिरी करीत आहेत असे दिसून येते आहे.समुहातील गुणवंत कवींचा "नवरंग "या शीर्षकाचा चारोळी संग्रह श्री.अरविंद कुलकर्णी यांनी साहित्य मंथन समूहासाठी २५ डिसेंबर २०१५ ला प्रकाशित केलाय.
कविता आणि चारोळी हे दोन्ही काव्य -प्रकार जसे कवी -प्रिय आहेत तितकेच ते वाचक -प्रिय आहेत ,म्हणून चारोळी लेखन करण्याकडे कवी-मित्रांचा ओढा असणे सहाजिकच आहे असे समजावे.असे असले तरी .कविता असो व चारोळी "या दोन्हीतही "आशयाची अभिव्यक्ती " कशी झाली आहे हे महत्वाचे आहेच आहे.ज्याला अभियाक्त होणे जमले .त्याचे लेखन-भान अधिक सजग आहे असे म्हणू या . एकच विषय ,एकच घटना ,एकच प्रसंग .."डोळ्यांनी पाहणारा ,आणि मनाच्या नजरेने पाहणारा ..एक बोलण्यातून आणि दुसरा शब्दातून व्यक्त होतो .तेव्न्हा कवींच्या शब्दातले सामर्थ्य "आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही. उत्तम आशयसंपन्न रचनेचे हेच वैशिष्ट्य असते.
"अल्पाक्षरी रमणीयता "हे कवितेचे विशेष असे लक्षणीय वैशिष्ट्य आहे.ते जसे कवितेला लागू आहे..तितकेच ते चारोळीला सुद्धा आहे.त्या दृष्टीने हे सगळे भान सांभाळून असणारी चारोळी ,एखाद्या संग्रहातून वाचकाला भेटते ,त्यावेळी अर्थातच " वाचनीय असा आनंद मिळतो.
साहित्य -मंथन च्या "नवरंग " या चारोळी संग्रहात याची प्रचीती नक्कीच येईल.
नवरंग -चारोळी संग्रहात .-महाराष्ट्रातील विविध भागात असलेले ही कवी-मित्र आहेत.- एका अर्थांने "विविधतेच्या मनोरम काव्य-छटा -म्हणजे नवरंग मधील-चारोळी रचना आहेत.
आकड्यातच सांगायचे झाले तर ..२३ कवींच्या -निवडक दोनशे चारोळ्यांचा समावेश या संग्रहात केलेला आहे.
हे रचनाकार या प्रमाणे --१. सुनील राजाराम पवार -सायन -मुंबई., २- डॉ. शरयू शहा- शिवाजी पार्क -मुंबई ,
३- दिलीप शेषराव धामणे - हिंगोली , ४- अनिल रामचंद्र हिस्सल- बुलढाणा
, ५- रामराव सर्जेराव जाधव -शिरापूर-अहमदनगर , ६- डॉ.शिल्पा जोशी - दादर -मुंबई , ७- सौ. प्रिया वैद्य -ब्रूकलेन-श्रेयसबरी -युएसए.
८- सौ. अंजना कर्णिक - माहीम -मुंबई . ९- सौ.जयश्री पाटील - वसमतनगर -जि.हिंगोली. ,
१०- बालाजी रामचंद्र धोंडगे - पाटील - नांदेड , ११- गजानन विश्वनाथ पाटील -पवार - वरुड-देवी ,जी.हिंगोली ,
१२- सौ.कुंदा अरविंद पित्रे - दादर(प) - मुंबई. १३- नागोराव सा. येवतीकर - येवती -जि.नांदेड .
१४- उत्कर्ष देवणीकर - उमरगा जि.उस्मानाबाद . १५ अरविंद रामचंद्र कुलकर्णी - अहमदनगर ,
१६-सौ.सुलभा प्रकाश कुलकर्णी - बोरीवली (प)- मुंबई . १७- डॉ.सुप्रभा कुलकर्णी - अहमदनगर , १८- जयंत देशपांडे - अहमदनगर ,
१९.गजानन व्ही .वारणकर - तरोडा (खु)-नांदेड . २०- योगेश पुंडलिक देवकर - साखरखेर्डा -जि.बुलढाणा .
२१- सौ.जागृती सुधीर निखारे - कल्याण , २२- उमेश भास्करराव खमितकर - गुंजोटी -जि.उस्मानाबाद.
२३- नंदकुमार सोवनी - बिबवेवाडी -पुणे .
या संग्रहाची सजावट समूह सभासदांनी केलेली आहे-
मुखपृष्ठ - डॉ.शिल्पा जोशी ,
सजावट - उत्कर्ष देवणीकर
यांचे या कामगिरी बद्दल अभिनंदन .
वाचक मित्र हो- दोनशे चारोळ्या आहेत.संग्रहातील नेमक्या कोणत्या चारोळ्या उदाहरणासाठी घ्याव्या ? कोणत्या कवींच्या घ्याव्या ?..हा मोठाच प्रश्न माझ्या पुढे होता..या वर एक सोपा आणि साधा उपाय ,तो करावा , साहित्य मंथन समूह , सहभागी कवी आणि ,प्रकाशक -संपादक -समूह संचालक श्री.अरविंद कुलकर्णी यांचेशी संपर्क साधून "नवरंग "चारोळी संग्रह घ्यावा.
या संग्रहाने यातील कवी-मित्रांना लेखनाची नवी दिशा नक्कीच मिळाली आहे.पुढच्या प्रवासासाठी या सर्वांना तुमच्या वतीने लेखन शुभेच्छा देतो.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------
नवरंग"-चारोळी संग्रह .
पृ-५० .देणगी मूल्य -रु. ६०/-
साहित्य मंथन -परिवार
अहमदनगर .
अरविंद कुलकर्णी -
संपर्क- 9689077239
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------------------
पुस्तक-परिचय लेख
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
------------------------------ ------------------------------ ------
No comments:
Post a Comment