पुस्तक परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------.
आत्मबल देणारी कविता -"
-आत्मभान ..!
-------------------------------------------------------------------
फेसबुक -जगतात -कालिदास चवडेकर हे सातत्याने कविता -लेखन करणारे एक कवी आहेत.संग्रह-रुपात कवीचे आपल्या कविते साहितचे येणे "एक अतिशय आनंददायक घटना असते. तितकीच ती त्याच्या कवितेची एक प्रकारे परीक्षा असते. कौतुक -प्रवास संपवून ही कविता पुढच्या प्रवासाची जाणीवपूर्वक तयारी करते आहे की नाही.याच्या खाणाखुणा संग्रहातील कवितेतून दिसू लागतात. म्हणून कवीच्या पहिल्या कविता -संग्रहाचे महत्व खूप असते.
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२
-----------------------------------------------------------------.
आत्मबल देणारी कविता -"
-आत्मभान ..!
-------------------------------------------------------------------
फेसबुक -जगतात -कालिदास चवडेकर हे सातत्याने कविता -लेखन करणारे एक कवी आहेत.संग्रह-रुपात कवीचे आपल्या कविते साहितचे येणे "एक अतिशय आनंददायक घटना असते. तितकीच ती त्याच्या कवितेची एक प्रकारे परीक्षा असते. कौतुक -प्रवास संपवून ही कविता पुढच्या प्रवासाची जाणीवपूर्वक तयारी करते आहे की नाही.याच्या खाणाखुणा संग्रहातील कवितेतून दिसू लागतात. म्हणून कवीच्या पहिल्या कविता -संग्रहाचे महत्व खूप असते.
कवी -कालिदास चवडेकर -- सोलापूरचे कवी म्हणून आता परिचित झाले आहेत.
"आत्मभान " हा त्यांचा पहिलाकविता संग्रह -मार्च -२०१५ ला - प्रकाशित झाला
आहे.त्यांचे या निमित्ताने मन:पूर्वक स्वागत आणि अभिनंदन करू या.
कवीचा पहिला संग्रह आला म्हणजे अनेक अर्थाने कवीला प्रसिद्धी मिळते , असे असले तरी त्याची "कवी-म्हणून जबाबदारी वाढते " हे कवीने मनात ठसवले पाहिजे. "चवडेकर -यांच्या ८० पृष्ठांच्या संग्रहात विविध स्वरूपाच्या कविता आहेत.
डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी या कवितेबद्दल शुभेच्छा देतांना म्हटले आहे.की- या कवीच्या कविता विचाराला प्रगल्भ करणाऱ्या, चिंतनाची खोली नि व्याप्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यांची प्रसन्न शब्दकळा ", अर्थवाही प्रतिमा आणि काव्याला असलेली अंगभूत लय " यामुळे या कविता ओठावर घोळ्वाव्या अशा वाटतात .".
रसिक हो -
कविमनाला अनेक प्रश्न पडत असतात .आणि कवी आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतो .यात कधी त्याच्या हाती निराशा हाती येते, कधी खंत -तर कधी खेद वाटून जातो .अशा वेळी मनास व्यक्त झाल्या शिवाय राहवत नाही. कवी चवडेकर सुद्धा - "जाणिवेचे भान" असलेला हा कवी - आपल्या कवितेला "आत्मभान " असे नाव देऊन व्यक्त होतो आहे.
तसे पाहिले तर
कवी -कालिदास चवडेकर यांच्या कवितेचा आरंभ २५ वर्षापूर्वी झालेला आहे.. त्या आठवणी इथे कवितेतून व्यक्त झाल्या आहेत ही जाणवते.
" घाव त्यांचे सोसणे आता जमाया लागले
आसवांना रोखणे आता जमाया लागले ....! (पृ. ७५)
"कुठला तरी हवाच मुखवटा
हे जगण्याचे सोंग
वठवीन्यासाठी ...! (पृ- ७२ ),
" कळत नाही
कोणते ते धागे
ओढताहेत अजून
आतल्या आत ... (पृ ..५५ )-
ही काही उदाहरणे पुरेशी आहेत. बाकी कविता संग्रहातून जरूर वाचल्या पाहिजेत.
रसिक हो - अशा या कविता कवी -कालिदास चवडेकर यांच्या पुढील आश्वासक प्रवासाची साक्ष देणाऱ्या आहेत.
त्यांच्या लेखनास आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ .
-------------------------------------------------------------
आत्मभान -(कविता -संग्रह )
-कालिदास चवडेकर - संपर्क- ९०२१४१९६७१
प्रकाशक-
विजय बुक सर्व्हिसेस -सोलापूर -
संपर्क- ९०२१७२७३३२
पृष्ठ - ८० , मुल्य- रु. ७०/-
------------------------------------------------------------------------------------
कवीचा पहिला संग्रह आला म्हणजे अनेक अर्थाने कवीला प्रसिद्धी मिळते , असे असले तरी त्याची "कवी-म्हणून जबाबदारी वाढते " हे कवीने मनात ठसवले पाहिजे. "चवडेकर -यांच्या ८० पृष्ठांच्या संग्रहात विविध स्वरूपाच्या कविता आहेत.
डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी या कवितेबद्दल शुभेच्छा देतांना म्हटले आहे.की- या कवीच्या कविता विचाराला प्रगल्भ करणाऱ्या, चिंतनाची खोली नि व्याप्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यांची प्रसन्न शब्दकळा ", अर्थवाही प्रतिमा आणि काव्याला असलेली अंगभूत लय " यामुळे या कविता ओठावर घोळ्वाव्या अशा वाटतात .".
रसिक हो -
कविमनाला अनेक प्रश्न पडत असतात .आणि कवी आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतो .यात कधी त्याच्या हाती निराशा हाती येते, कधी खंत -तर कधी खेद वाटून जातो .अशा वेळी मनास व्यक्त झाल्या शिवाय राहवत नाही. कवी चवडेकर सुद्धा - "जाणिवेचे भान" असलेला हा कवी - आपल्या कवितेला "आत्मभान " असे नाव देऊन व्यक्त होतो आहे.
तसे पाहिले तर
कवी -कालिदास चवडेकर यांच्या कवितेचा आरंभ २५ वर्षापूर्वी झालेला आहे.. त्या आठवणी इथे कवितेतून व्यक्त झाल्या आहेत ही जाणवते.
" घाव त्यांचे सोसणे आता जमाया लागले
आसवांना रोखणे आता जमाया लागले ....! (पृ. ७५)
"कुठला तरी हवाच मुखवटा
हे जगण्याचे सोंग
वठवीन्यासाठी ...! (पृ- ७२ ),
" कळत नाही
कोणते ते धागे
ओढताहेत अजून
आतल्या आत ... (पृ ..५५ )-
ही काही उदाहरणे पुरेशी आहेत. बाकी कविता संग्रहातून जरूर वाचल्या पाहिजेत.
रसिक हो - अशा या कविता कवी -कालिदास चवडेकर यांच्या पुढील आश्वासक प्रवासाची साक्ष देणाऱ्या आहेत.
त्यांच्या लेखनास आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ .
-------------------------------------------------------------
आत्मभान -(कविता -संग्रह )
-कालिदास चवडेकर - संपर्क- ९०२१४१९६७१
प्रकाशक-
विजय बुक सर्व्हिसेस -सोलापूर -
संपर्क- ९०२१७२७३३२
पृष्ठ - ८० , मुल्य- रु. ७०/-
------------------------------------------------------------------------------------

No comments:
Post a Comment